नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – जून महिना पूर्णतः कोरडा गेल्याने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबट ओल्या ओलीवर शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने खरिपाची पेरणी केली होती. मात्र पेरणी झाल्यापासून दीड ते दोन महिने पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची पिके करपून गेली आहेत. परिणामी राज्यासह बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या सरकारला शेतकऱ्यांविषयी कसलीच काळजी नसल्याचे दिसून येत आहे. खुद्द राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील असताना सुद्धा शेतकरी हे वाऱ्यावर सोडल्या सारखे झालं आहे.म्हणून या सरकारला जागे करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी चे बीड जिल्हा महासचिव अक्षय भुंबे यांच्या नेतृत्वाखाली डिघोळ अंबा या गावी राज्य रस्त्यावर गावकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधी घोषणा देत आपला आक्रोश व्यक्त केला.यावेळी अक्षय भुंबे यांनी बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा लागू करावा,APL अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांचे राशन बंद केले आहे ते परत सुरू करावे,डाटा एन्ट्री चालू करावी,प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात यावेत अशी मागणी केली. जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासचिव अक्षय भुंबे यांनी दिला आहे.
यावेळी मंडळ अधिकारी श्रीमती देशमुख यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले व आंदोलन कर्त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडू असे आश्वासन दिले.यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे बीड जिल्हा अध्यक्ष बाबुरावजी मस्के, जिल्हा उपअध्यक्ष अस्लमभाई पठाण,अभिजित वाव्हळ अंबाजोगाई शहर अध्यक्ष अमोल हातागळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अजय वाघमारे तालुका अध्यक्ष अनिल कांबळे,परमेश्वर लांडगे, अविनाश घनघाव,योगेश घुंडरे, रामचंद्र घुंडरे,राहुल भूंबे,ऍड.विकास भुरे शेख रहिम शेख अफसर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



