महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मुख्य बातम्या व्हिडिओ

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंबिवलीत जलमार्गाचा वापर, जीव मुठीत घेउन प्रवास

प्रतिनिधी.

डोंबिवली – डोंबिवली ते शिळफाट्याचा तासन् तास रखडवणारा प्रवास, खड्डे, वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून डोंबिवलीकरांनी चक्क जलमार्गाचा पर्याय शोधून काढलाय. डोंबिवलीहून सुटणाऱ्या या बोटीने अवघ्या अर्ध्या तासात ठाणे गाठता येतं.मात्र बोटीने प्रवास करणाऱ्याची संख्या वाढत चालली असून सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता प्रवास केला जातो आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.

राज्यात मिशन बिगीन अगेन आणि अनलॉक सुरू झालं असलं, तरीही सर्वसामान्य प्रवाशांना मात्र अजूनही लोकल प्रवासाची मुभा मात्र मिळालेली नाहीये. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकर चाकरमान्यांना रस्ते मार्गाने, म्हणजेच शिळफाट्यामार्गे ठाणे मुंबईचा प्रवास करावा लागतोय. मात्र या प्रवासामध्ये वाहतूक कोंडी, खड्डे यामुळे अनेक तास वाया जातात. त्यामुळेच यावर उपाय म्हणून डोंबिवलीकरांनी आता जलमार्गाचा वापर सुरू केलाय. डोंबिवली पश्चिमेच्या मोठागाव रेतीबंदरहून माणकोली जवळच्या वेहेळे गावापर्यंत फेरीबोट सेवा सुरू आहे. या बोटीने आता हे चाकरमानी प्रवास करून ठाणे गाठतात. मोठागाव ते वेहेळे या प्रवासाला अवघी पाच मिनिटं लागतात. तिथून माणकोलीपर्यंत रिक्षाने दहा मिनिटं आणि माणकोलीहून ठाण्यापर्यंत रिक्षाने पंधरा मिनिटं अशा अवघ्या अर्ध्या तासात डोंबिवलीकर प्रवासी वाहतूक कोंडी टाळून ठाणे गाठतात. ठाण्यात जाण्यासाठी कमी वेळ लागत असल्याने या बोटीला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

त्यामुळे बोटीतून जास्तीतजास्त प्रवासी भरून नेले जातात आणि सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता प्रवास केला जातो आहे. जर एखादी दुर्घटना झाली तर जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तर याला महाराष्ट्र शासन जबाबदार आहे असे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.तर बोटीतून पाच ते सहाची कॅपेसिटी असताना पंधरा ते वीस जण प्रवास करतात,एखादी दुर्घटना घडली कोण जबाबदारी घेणार? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

Related Posts
Translate »