महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापुरुषांचे अवमान, सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – सध्या राज्याच्या राजकारणात महापुरुषांचा सुरू असणारा अवमान हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतूत्वाखाली सुरू असल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षच्या उप नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणात केला. कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर झालेल्या महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून भाजपसह सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले.

त्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का शांत ?
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महापुरुषांचे अपमान करून महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जात असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधा निंदाजनक ठरावही मांडत नाही असे सांगत अंधारे यांनी यावेळी टिका केली. तर महाराष्ट्राचा इतका अपमान सुरू असतानाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शांत का बसले आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही.?
तर एकीकडे भाजपकडून सतत सावरकर प्रेम दाखवले जात असताना तिकडे गुजरातमध्ये मात्र काँग्रेसचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा का उभारला गेला? तुम्हाला सावरकर इतके प्रिय होते तर त्यांना भारतरत्न का नाही दिला नाही? असे प्रश्न त्यांनी भाजप नेत्यांना यावेळी विचारले. तर ज्या पद्धतीने सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे, बच्चू कडू यांची अवस्था झाली आहे तशीच अवस्था शिवसेना सोडून गेलेल्या या 40 जणांची होणार आहे.
आपले 40 भाऊ कॉपी करून पास झाले असून त्यांना हे कळत नाही की सरकारमध्ये सगळी मलिद्याची खाती भाजपकडे गेली आहेत. आणि माझ्या भावांकडे मात्र सगळी कपडे फाडण्याची खाती असल्याची मिश्किल टिकाही अंधारेंनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री…
तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून त्यांच्याच इशाऱ्याने हे सरकार चालत आहे. नुकत्याच झालेल्या समृद्धी महामार्गाच्या पाहणीदरम्यान गाडीचे स्टिअरिंग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती दिसले. यावरून हेच अधोरेखित होत असल्याची टीकाही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.

उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्याचे पाहायला मिळेल..
महाप्रबोधन यात्रेला राज्यात प्रतिसाद चांगला मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आम्हाला खात्री आहे की येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचे चित्र पाहायला मिळेल, असा विश्वासही अंधारे यांनी यावेळी व्यक्त केला.

लाव रे तो व्हिडिओ
यावेळी सुषमा अंधारे यांनी या सभेमध्ये भाजपसह सत्ताधाऱ्यांमधील विविध नेत्यांचे छोटे छोटे व्हिडीओ लावून सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर किरीट सोमय्या यांनी ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले, त्यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता चौकशा कशा काय थांबल्या ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी सुषमा अंधारे यांच्यासह उपनेते शरद कोळी यांच्यासह शरद पाटील, हर्षवर्धन पालांडे, सदानंद थरवळ, विवेक खामकर, सचिन बासरे, बाळ हरदास, अल्ताफ शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »