महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर

कल्याणातील १३ वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार, टायकॉन्स ग्रुपचे आश्वासन

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील मोजे चिकनघर परिसरात असलेल्या शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा गेल्या १३ वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्वासन टायकॉन्स ग्रुपचे सह-संचालक श्रीकांत शितोळे यांनी दिले आहे.खडकपाडा येथील स्प्रिंगटाईम्स क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी टायकॉन्स ग्रुपचे चेतन सराफ, पवन भोसले, संतोष पाटील हे देखील उपस्थित होते.

या प्रकल्पातील सदनिकाधारकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप करत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी २ ऑगस्टपासून वायले नगरमधील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या ठोस आश्वासनानंतर त्यांनी ५ ऑगस्ट रोजी उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला.प्रकल्प रखडण्यामागे सरकारी परवानग्या, वेळोवेळी झालेल्या लेआऊटमधील बदल आणि कोरोना काळातील अडथळे जबाबदार असल्याचा खुलासा शितोळे यांनी केला. सुमारे १८ ते २० सोसायट्यांचा एकत्रित पुनर्विकास करताना अनेक अडचणी आल्या असून, त्या सोडवून लवकरच सदनिकाधारकांना हक्काची घरे देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपोषण स्थगित करण्यासंदर्भात नरेंद्र पवार यांनी सांगितले की, मुरबाडचे आमदार किशन कथोरे आणि भिवंडीचे आमदार महेश चौगुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उपोषणाची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढील कॅबिनेट बैठकीनंतर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना पोलिस अथवा म्हाडा मार्फत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.“मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण तूर्तास स्थगित करत आहोत. मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचे दरवाजे खुले आहेत,” असा इशारा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »