महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण डोंबिवलीसाठी कुशिवली धरण आरक्षित करण्याची आ. विश्वनाथ भोईर यांची मागणी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीकरांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्वतंत्र धरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हं दिसत आहेत. कल्याण डोंबिवलीसाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली. ज्याला ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा विभाग आणि केडीएमसीला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसंदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत समिती सभागृहात झालेल्या या बैठकीत मतदारसंघातील महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

गेल्या दशकभरात कल्याण आणि डोंबिवली शहरांचा अतिशय वेगाने नागरी विस्तार झाला. अनेक मोठमोठाली गृहसंकुलं किंबहुना एक प्रकारची नवी शहरेच या दोन्ही शहरांच्या वेशीवरील मोकळ्या जागांवर उभी राहिली. मुंबई, ठाण्यापेक्षा स्वस्त दरांमध्ये सुसज्ज आणि सुविधायुक्त अशी घरे उपलब्ध झाल्याने हजारांच्या संख्येमध्ये त्यांची विक्रीही झाली. परंतू त्याचा सर्व भार आता मूलभूत सोयी सुविधांवर येऊ लागला असून कल्याण डोंबिवलीतील बऱ्याचशा नव्या गृहसंकुलांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे.

येत्या काळात ही पाणी समस्या अतिशय उग्र रूप धारण करेल याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण डोंबिवलीसाठीच्या स्वतंत्र धरणाची गरज अधोरेखित केली. अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली धरण कल्याण डोंबिवलीसाठी आरक्षित करावे किंवा या धरणातील पाण्याचा वाढीव कोटा केडीएमसीला देण्याची मागणी आमदार भोईर यांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणताही समय न दवडता ठाणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देत जिल्हा आणि केडीएमसी प्रशासनाची एक संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले. गेल्या मंगळवारी संपन्न झालेल्या या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कुशिवलि धरणाच्या पाणी साठ्याबाबत जलसंपदा विभागाला तर पुढील तीस वर्षातील केडीएमसीची संभावित लोकसंख्या आणि पाण्याची गरज यासंदर्भात कल्याण कल्याण डोंबिवली महापालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या आजमितीस सुमारे 24 लाखांच्या घरात पोहोचली असून सध्या आपल्याला आवश्यक तितका म्हणजेच प्रतिदिन 423 दशलक्षलीटर पाणी पुरवठा होत आहे. पुढील तीस वर्षांचा टप्प्याटप्प्याने विचार करता 2032 मध्ये लोकसंख्या 34 लाख 90 हजार आणि प्रतिदिन गरज 616 दशलक्षलीटर, 2042मध्ये 50 लाख 88 हजार आणि प्रतिदिन गरज 898 दशलक्षलीटर तर 2052 मध्ये लोकसंख्या 74 लाख आणि पाण्याची प्रतिदिन गरज 1हजार 310 दशलक्ष लिटर भासणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भविष्यातील लोकसंख्येचा आणि आकडेवारीचा विचार करता मुबलक पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र धरण आरक्षित करणे ही काळाची गरज बनली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याविषयी अतिशय संवेदनशील असून येत्या काळात कल्याण डोंबिवलीकरांना स्वतंत्र धरण किंवा पाणीसाठ्याच्या वाढीव कोट्याबाबत योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »