महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

आम्हाला ”बी टीम” म्हणणाऱ्यांनी पहाटेचे सरकार स्थापन करून स्वतःची विश्वसाहार्ता धोक्यात आणली आहे -सुजात आंबेडकर

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ युवानेते सुजात आंबेडकर यांची पहिली वाहिली राजकीय सभा आज राहुल नगर नंबर १ येथे पार पडली. या प्रसंगी सुजात यांनी पक्ष बांधणी, विस्तार, विरोधक सगळ्यांचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले, वंचितांची सत्ता स्थापन करायची असेल तर खूप जास्त मेहनत करावी लागेल. घरोघरी जाऊन आपला संपर्क वाढवला पाहिजे. वंचित भूमिका बाळासाहेबांची भूमिका ही नेमकी काय आहे? एक निवडक घटक सोडला तर इतर कोणत्या घटकांसाठी आहे याचा देखील प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. मागील दोन निवडणुकांमध्ये आपण पहिले फक्त आपल्या समाजातील ताकदीवर निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे आपल्या आपल्या समाजाव्यतिरिक्त इतर समजतील मतदाता जोडता आला पाहिजे. त्या परीने प्रयत्न करा. आपला समाज सोडून इतर समाजातील तीन व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीचा मतदाता म्हणून तयार करा. पुढच्या निवडणुकीत अपयशाचं हे चित्र नक्की पालटलेलं असेल. प्रस्थापित पक्ष हे सिंडिकेट राजकारण करून वंचित वर्गाला वंचितच ठेवण्यात धन्यता मनात आहे.

वंचित बहुजन आघाडीचा अपप्रचार करण्यासाठी पक्षाचा बी टीम म्हणून उल्लेख केला जात होता. मात्र पहाटेचे सरकार स्थापन करून विश्वासार्हता कोणी गमावली आहे याचा प्रत्येकाने विचार करावा. लाटेवरती स्वार होऊन कोणीही निवडणूक जिंकू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तम उदाहरण आहे. मात्र यंदा आपल्या निवडणूक निव्वळ जिंकायची नसून मोठ्या प्रमाणात सत्ता देखील स्थापन करायची आहे. अलीकडेच मी एक वक्तव्य ऐकलं मशिदीवर मोठे भोंगे लावले तर त्याठिकाणी हनुमान चालीसा वाचली जाईल. मी या विधानाला १०० टक्के पाठिंबा देतो फक्त अमित ठाकरे यांनी पहिल्यांदा त्याचा शुभारंभ करावा याकरिता एकाही बहुजन माणूस नका जानवे घालून हनुमान चालीसा म्हणण्याला माझी हरकत नाही. माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती आहे, तुम्ही शरद पवारांची मुलाखत घ्या किंवा उभा पक्ष प्रस्थापित पक्षाच्या प्रचारासाठी उसना द्या मात्र तुमचा संपलेला पक्ष जातीय तेढ निर्माण करून होणाऱ्या दंगलीवर उभा करू नका. कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांसमोर केले आहे त्यामुळे दंगली झाल्या तर कोणाला अटक याबाबत संभ्रम नको.

येणारा काळ खूप अवघड आहे. आपल्याविरुद्ध खूप अपप्रचार केला जाणार आहे. निवडणूका जिंकण्यासाठी आपल्याकडे पैसा, रिसोर्सेस, ताकद नाही मात्र एक गोष्ट आहे ती म्हणजे जिद्द तुमच्यातील जिद्द पक्षाची ऊर्जा म्हणून काम करणारी आहे. चुनाभट्टीमधील राहुल नगर नंबर १ कार्यालय उद्घाटन प्रसंगी सुजात आंबेडकर मुंबईत बोलत होते. लंडन मधील रॉयल हॅलोवे युनिव्हर्सिटीमधून शिक्षण एमएससी इन इलेक्शन कॅम्पेनिंग ॲण्ड डेमोक्रसी याविषयात शिक्षण संपादन भारतात आले आहेत. सुजात यांची मुंबईत झालेली ही भव्य रॅली होणार आणि पहिली राजकीय सभा आगामी निवडणुकांना केंद्रस्थानी ठेवून महत्वाची समजली जाते. विकासाचे मुद्दे, विधेयक कामे सोडून सामाजिक शांतता ढवळून काढणारे राजकारण आणि राजकारणी सध्या काम करत आहेत. यासंदर्भात लवकरच पारित पैगंबीर बिल अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कारवायांना आळा घालणारा आहे. हे बिल सर्व धर्मासाठी आणि धार्मिक परंपरा जपण्यासाठी तयार करण्यात येत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू या नात्याने आंबेडकरी जनतेत असलेला उत्साह या निमित्ताने दिसून येत होता.

लंडन वरून शिक्षण संपवून आलेले बाबासाहेब आम्ही पहिले नाहीत मात्र सुजात आंबेडकर यांना पाहून ती कसर देखील भरून निघाली असे भावनिक उद्गार तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांनी काढले. ही रॅली सिंग्नल-पाईप लाईन रोड-शिवसृष्टी- एटीआय-राहुल नगर नंबर १ चुनाभट्टी २२ या मार्गावर आयोजित केली होती. त्या पश्चात आयोजित सभा वंचित बहुजन आघाडी कार्यालयाजवळ घेण्यात आली. याप्रंगी मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान, मुस्लिम बहुजन आघाडीचे सय्यद मंजूर, मुंबई निरीक्षक कलम खान, मुंबई महासचिव आनंद जाधव, मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा अध्यक्ष कृतिका जाधव, सतीश अमुलगे, तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, संध्या पगारे, प्रबुद्ध भारत उपसंपादक जीतरत्न पटाईत, राज्य सदस्य अक्षय बनसोडे, वॊर्ड अध्यक्ष शिंगोरे, वॊर्ड अध्यक्ष महिला दीक्षा शेगोकार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »