महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या राजकीय

“हा गडी थांबणारा नाही” शरद पवारांचा विरोधकांना टोला

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

बारामती/प्रतिनिधी – जेष्ठ नेते तसेच खासदार शरद पवार यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या बारामतीत प्रचाराला सुरुवात केली आहे. शरद पवार आज बारामती तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहे. येथील उंडवडी कप या ठिकाणी त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले यावेळी पवार म्हणाले की “राज्यात सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे. याबाबत पाणी साठवण्याबाबत काही निर्णय घेतले. त्यावेळी दुष्काळ पडल्यावर गाव भाकरी दिली जायची. गावोगावी रोजगार हमी आणि बंधारे बांधण्यास सुरुवात केली.त्याकाळी भैरवनाथ शिक्षण संस्था काढण्यात आली. मात्र या संस्थेला अध्यक्ष म्हणून माझं नाव असल्याचं मला आज समजलं. मला सगळ्यात जास्त आनंद होतो, ज्यावेळी मी शेवटच्या दहा वर्षात देशाचा कृषिमंत्री होतो. मी देशाचा कृषिमंत्री झाल्यावर माझ्यासमोर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी देशात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र जो देश कृषिप्रधान देश आहे त्या देशात अन्न धान्याची आयात करणे मला पटले नाही. माझ्या काळात मी 71 हजार कोटींची कर्ज माफी केली. व्याज दरात शेतकऱ्यांना सुट दिली. कोणी न स्वीकारलेलं कृषी खात मी स्वीकारल. शेतीत अनेक बदल केल्याने आज जगात 18 देशांना आपण धान्य निर्यात करतो. शेतकऱ्यामुळे ही बाब घडून आली. सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. जर सत्ता एक व्यक्तीच्या हातात. काहीजण म्हणतात बारामतीची निवडणूक ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला हे मी सांगण्याची गरज नाही. सगळ्यांना मी मंत्रीपदे दिली. माझा स्वभाव वेगळा असल्याने मी कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घातले नाही. काहींनी टोकाची भूमिका घेतली आणि भाजप सोबत गेले. अनेक लोकांना संधी द्यायची होती, हा माझा हेतू होता. एमआयडीसीमध्ये हजारो कामगार काम करीत आहेत. जनाई शिरसाई मध्ये काही अडचणी असतील तर त्यात आता मी लक्ष घालणार आहे. ज्यांच्या हातात मी ह्या गोष्टी सोपविल्या होत्या. ही कामे त्यांनी केली नाही. त्यामुळे माझ्या लोकांसाठी मी आता या गोष्टीत लक्ष घालणार आहे. सुप्रिया सुलेनची कामगिरी ससंद सांगते. मी सांगत नाही. तिच्या अंगावर कधीही भ्रष्टाचाराचा आरोप झालेले नाहीत. सध्या आपली खून बदलली आहे. तुतारी ही आपली खून आहे. जिरायती भागाने कधीही आमची साथ सोडली नाही.”

शरद पवार यांच्या वयावरून अनेकदा टिप्पणी केली जाते. याबाबत शरद पवार यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला. पवार म्हणाले की “माझं वय काढू नका ? तुम्ही काय बघितलं आहे माझं हा गडी थांबणारा नाही तुम्ही लोकांनी मला आमदार केल मंत्री केलं,चारवेळा मुख्यमंत्री केलं. मात्र तुम्ही लोकांनी मला 56 वर्ष एकही सुट्टी दिली नाही.शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो मात्र आपण मला सुट्टी देत नाहीत.”

Related Posts
Translate »