महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image थोडक्यात देश

नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभे राहणार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली – लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा मुद्दा प्रथमच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. अखिल भारतीय लवणकार (आगरी) समाजाच्या नवी दिल्लीत सोमवारी झालेल्या बैठकीत दि. बा. पाटील यांचे विमानतळाला नाव देण्याबरोबरच समाजाच्या विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर पावसाळ्यानंतर दोन लाख समाजबांधवांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यामुळे प्रथमच नवी मुंबईनंतर नवी दिल्लीतही दिबांच्या नावासाठी आंदोलन उभे राहणार आहे.
मिठागरांमध्ये मीठ जमा करण्याचे कार्य ज्यांचे पूर्वज करीत होते, त्या देशभरातील २२ राज्यांतील लवणकार (आगरी) समाजातील निवडक प्रतिनिधींचे संमेलन नवी दिल्ली येथील राजा राममोहन मेमोरियल हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन जगद्गुरू श्री श्री श्री पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामीजी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती होती. प्राचीन लवणकार आणि व्यापारी जाती संघाच्यावतीने संयोजक कृष्ण कुमार भारती यांनी संमेलनाचे आयोजन केले होते. या बैठकीला समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राला श्री रामृल्लू सागर, कार्यकारी अध्यक्ष एस. पी. सिंग लबाना, कर्नाटक उपारा विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. के. गिरीश उपारा, तेलंगणमधील उपारी शेखर सागर, महाराष्ट्रातून दशरथ पाटील, प्रा. एन. के. हिवरकर, बाळासाहेब गोडसे, अरुण पाटील, दिपक खाटेघरे आदींची उपस्थिती होती.
नियोजित नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचा लवणकार समाजाकडून आग्रह धरण्यात येणार आहे. नवी मुंबईसह ठाणे व रायगड जिल्ह्यात दिबांचे नाव देण्यासाठी स्थानिक आगरी समाजाने केलेल्या आंदोलनाची माहिती दशरथ पाटील यांनी बैठकीत दिली. त्यानंतर इतर राज्यातील लवणकार प्रतिनिधींनीही विमानतळाला नाव देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. तसेच त्यासाठी पावसाळ्यानंतर रामलीला मैदानात देशभरातील दोन लाखांहून अधिक समाजबांधवांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर लवणकार समाजाच्या विविध मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात येणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »