महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

केंद्राच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशात मुंबई वेगळे करण्याचा प्रयत्न होवु शकतो – नाना पटोले

नेशन न्यूज मराठी टीम.

भंडारा / प्रतिनिधी – नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज भंडारा शहरात कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा काढण्यात आली. यावेळी भंडारा शहरातुन मुख्य मार्गाने प्रभण करीत गांधी चौक येथे सभा घेण्यात आली. यावेळी सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध महत्वाच्या मुद्द्यावर आपले मत मांडले.

एक देश एक निवडणुक ह्या मुद्दावर बोलताना ते म्हणाले कि, देशात एक देश एक निवडणुकीचे कॉंग्रेस समर्थनच करणार.संविधानात व्यक्तिमत्वाला आगळा वेगळा महत्व आहे. ईव्हीएम मशीन बाबतचा संभ्रम दुर केला पाहीजेत. जगाच्या पाठीवर आज सर्वच देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होतात.

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यावर भाष्य करताना पटोले म्हणाले, मराठा आरक्षण देण्याचे अधिकार राज्याचे नाही.आता केंद्राचे विशेष अधिवेशन आहे. राज्यातील भाजपचे नेते व मुख्यमंत्री यांनी केंद्राला ५० टक्के आरक्षणाची मर्याठा उठविण्याची मागणी करावी. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत यापुर्वी असा कायदा आणला होता मात्र न्यायालयाने त्याच्यावर चुकीच्या प्रकारे कायदा केल्याचे ताशेरे ओढले होते.

दहीहंडीच्या सणाला भंडारा घटनेत गालबोट लागले. दही हंडी कार्यक्रमात टॉवर कोसळुन आठ ते दहा गोविंदा जखमी झाले होते.मात्र या प्रकरणात गुन्हा नोंद व्हायला हवा पोलीसांनी तसे केले नसल्यास आपण त्याची दखल घेवु. कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो. असे त्यांनी वक्तव्य केले.

केंद्राकडून महाराष्ट्रासाठी जी सूत्रे हलवली जात आहेत त्याबाबत बोलताना पटोले म्हणाले कि, मुंबईला केंद्रशासित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. केंद्राच्या पाच दिवसाच्या अधिवेशात मुंबई वेगळे करण्याचा प्रयत्न होवु शकतो. केंद्राचे हे विशेष अधिवेशन देशाची काय राखरांगोळी करून जाईल हे आताच सांगता येणार नाही.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »