महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी चर्चेची बातमी

विकतचे पाणी घेऊन जगवलेल्या कांद्याला नाही भाव

नाशिक/प्रतिनिधी – राज्यभरात वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणी टंचाईची धग जनतेला बसत आहे. पाण्यासाठी लोकांची वणवण पाहायला मिळत आहे. पाणी नसल्यामुळे शेतातली पीकं सुकायला लागली आहेत. नाशिक मधील येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याचे टँकर विकत घेऊन त्या पाण्यावर वाळत चाललेले पीक जगवले. कांद्याचा एकरी एक लाख ते सव्वालाख रुपयांपर्यंत खर्च आला. पण आता एवढ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये कांद्याला बाजार भाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 400 रुपयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 1751 ते 1200 रुपये दर मिळत आहे. या दरात उत्पादन खर्च ही निघणे मुश्किल झाले असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी एकनाथ गायकवाड यांनी सांगितले. शर्ती न लावता संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी हटवण्याची मागणी शेतकाऱ्यांकडून केली जात आहे.

 

Related Posts
Translate »