नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव/प्रतिनिधी – जळगावातील जामनेर जवळ धावत्या बसचे अचानक चाक निखळल्याची घटना घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील 51 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही अथवा कोणीही जखमी झालेले नाही. छत्रपती संभाजी नगर ते मुक्ताईनगर कडे बस जात होती. जामनेर बसस्थानकातून बस निघाल्यानंतर धावत्या बसचे अचानक चाक निखळून बाजूला झाले. चालकाने प्रसंगावधान दाखवत बसवर नियंत्रण मिळवले तसेच काही अंतरावर जाऊन बस सुखरूप उभी केली. त्यामुळे बसमधील 51 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत अन्यथा मोठे दुर्घटना घडली असती. बसमधील प्रवाशांनी चालकाचे खूप खूप आभार मानले आहेत.



