महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image आरोग्य लोकप्रिय बातम्या

काळ आला होता पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याची वेळ आली नाही

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/abf_Zx-4olY

कल्याण/प्रतिनिधी – आपल्याकडे डॉक्टरांना देव किंवा देवदूत असे म्हटले जाते. या शब्दांचा जिवंत अनुभव कल्याणात एका गरीब कामगाराला आला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या या कामगाराला कल्याणच्या आयुष हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करत या कामगाराला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे.

इमारत बांधकाम क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीचा साधारणपणे महिन्याभरापूर्वी अतिशय गंभीर अपघात झाला होता. इमारतीचे काम सुरू असताना उंचीवरून खाली कोसळताना टोकदार बांबू त्याच्या पोटाच्या उजव्या कुशीतून लिव्हर, किडनी ,आतडे आणि फुफ्फुसाला छेदून आरपार बाहेर निघाला. त्यावेळी इतर कामगार आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाने क्षणाचाही विलंब न करता या कामगाराला जवळच्याच आयुष हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रुग्णालयात आणले त्यावेळी त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्वरित उपाय चालू करून रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवत तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रियाही केली. तब्बल ८ ते ९ तास चाललेली ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे सर्जन डॉ. शशांक पाटील, डॉ. राजेश राजू , डॉ.अनिकेत वाळिंबे आणि भूलतज्ज्ञ डॉ जितेंद्र बोबडे यांनी यशस्वीरित्या करत या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत प्राण वाचवले.

तर शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. ज्याठिकाणी डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. विठ्ठल भिसे आणि अतिदक्षता विभागाततील आयसीयू टीमने प्रयत्नांची अक्षरशः पराकाष्ठा करत या कामगाराला नविन जीवदान दिले. सध्या हा रुग्ण स्वतःच उठून बसत आहे, व्यवस्थित बोलत आणि खात असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

सामाजिक जाणिवेतून आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि प्रशासनाने अतिशय माफक दरात उपचार केल्याची माहिती डॉ. राजेश राजू यांनी दिली. या खर्चापेक्षा आम्ही एका व्यक्तीचा जीव वाचवू शकलो याचे आम्हाला सर्वाधिक समाधान असल्याची भावनाही आयुष हॉस्पिटलच्या या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान आतापर्यंत अशा किचकट शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना मुंबईतील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हे चित्र खोडून काढत जपलेल्या या सामाजिक भान आणि जबाबदारीचे कल्याणकरांकडून कौतुक केले जात आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »