महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image देश लोकप्रिय बातम्या

राष्ट्रपतींना ‘स्वतंत्रता संग्राम मे जनजाती नायकों का योगदान’ पुस्तकाची पहिली प्रत सादर

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – ‘जनजाती अनुसंधान – अस्मिता, अस्तित्व एवम् विकास’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या प्रतिनिधींनी आज म्हणजे 28 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान यांच्याकडून राष्ट्रपतींना ‘स्वतंत्रता संग्राम मे जनजाती नायकों का योगदान’ या पुस्तकाची पहिली प्रतही सादर करण्यात आली.

त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, तंत्रज्ञान आणि परंपरा तसेच आधुनिकता आणि संस्कृती यांची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. आपण ज्ञानाच्या बळावर जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज असले पाहिजे. आदिवासी समाजाच्या ज्ञानाचा विकास भारताला ज्ञान-महासत्ता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

आपला इतिहास आणि परंपरा समजून घेण्यासाठी तरुणांना प्रेरणा मिळत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. आपल्या समाजाच्या इतिहासाची आणि संस्कृतीची वैशिष्टय़े यावर संशोधन आणि लेखन करण्याकडे तरुणांचा कल असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास, देशाच्या आणि समाजाच्या समृद्धीची स्वप्ने आपल्या तरुणांनी समजून घेतली आणि ही स्वप्ने साकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तरच भारताची प्रगती होऊ शकते, असे त्या म्हणाल्या.

आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी नेत्यांचे योगदान, चर्चासत्र इत्यादी फोटो प्रदर्शनांसह – प्रमुख विद्यापीठांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राष्ट्रपतींनी राष्ट्रीय अनुसूचित जमातीं आयोगाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की या कार्यक्रमांमुळे आदिवासी तरुणांचा  त्यांच्या पूर्वजांच्या बलिदानाचा आणि त्यांच्या समाजाच्या स्वाभिमानाच्या महान परंपरेचा अभिमान वाढेल.

आपल्या देशातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या 10 कोटींहून अधिक आहे, याकडे लक्ष वेधून राष्ट्रपती म्हणाल्या  की, विकासाचे फायदे या सर्वांपर्यंत पोहोचणे आणि त्याच वेळी त्यांची सांस्कृतिक ओळख अबाधित राहणे, हे त्यांच्यासमोर आव्हान आहे. याशिवाय त्यांच्या विकासासाठी चर्चा आणि संशोधनात त्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे.

‘स्वतंत्रता संग्राम मी जनजाती नायकों का योगदान’ हे पुस्तक प्रकाशित करणे हा एक चांगला उपक्रम आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. या पुस्तकाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या संघर्षाच्या आणि बलिदानाच्या कथा देशभरात मोठ्या प्रमाणावर पोहोचवल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »