नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थिती बाबत आपले मत व्यक्त करताना विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते ह्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांच्याबाबत वक्तव्य करताना म्हटले कि, कालच्या सभेत अजित पवार यांनी खरं सांगितलं ते सत्तेसाठी नाही. तर ईडीमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमुळे गेले असावे. मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो असतो याचा अर्थ मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी गेले हे समजू शकतो, त्या पदासाठी नाही मग कशासाठी केले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पहिल्यांदा सत्य बोलले, हे मी मान्य करतो.
राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार ह्यांच्या उत्तर सभेबाबत देखील बोलताना वडेट्टीवार म्हणाले कि, स्पर्धा की आपापसात ज्या चर्चा आहे, त्यातून उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शंभर टक्के फुटलेली आहे, नऊ आमदार फुटल्यामुळे हे आता स्पष्ट झालं आहे. अजित पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करण्याचा दृष्टांत दहा वर्षापूर्वी का झाला नाही? आत्ताच का झाला ते त्यांनाच माहित.
मनसेच्या मुंबई गोवा पदयात्रा संबंधी वडेट्टीवार म्हणाले कि, कोकणात रस्ता खराब झाला ते योग्य आहे, यापूर्वी आंदोलन होण्याची गरज होती, समृद्धी पेक्षा तो रस्ता जास्त महत्वाचा आहे, अनेक जण कोकणात जातात, त्या रस्त्यावर आंदोलन होत असतील त्यामुळे नक्कीच रस्ता दुरुस्त होईल.