नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – जालन्यात मराठा क्रांती मोर्च्याचे उपोषणकर्ते आरक्षणच्या मुद्द्यावर ठाम आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात चर्चा होत आहेत. यामुळ महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्यावर मराठा आणि ओबीसी समोरासमोर आले आहेत. मराठा समाजातील जरांगे पाटील हे 17 दिवस आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्र्यांनी पाटील यांचं उपोषण अश्या आश्वासनाने सोडवलं तर नागपूरात ओबीसी समाज देखील उपोषण सुरु ठेवेल. ओबीसी उपोषणाचा 5 दिवस आहे.
जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या आहेत त्यामध्ये एक मागणी आहे की, सरकार मराठा यांना स्वतंत्र आरक्षण देऊ शकलं नाही तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणी वर ओबीसी मधील कुणबींचा विरोध आहे. आज नागपूरात पत्रकार परिषदेत राष्ट्रीय ओबीसी संघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जाहीर केलं की, आम्ही आमचे उपोषण तोपर्यंत राहील जेव्हा पर्यंत सरकार लिहून देत नाही की मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देणार नाही व मराठ्यांचे ओबीसीकरण करण्यात येणार नाही. तसेच मागच्या दाराने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सरकार ओबीसी समाजातील ४०० जातींवर अन्याय करणार आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.



