महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र

लोकांचा अंत सरकारने पाहू नये, २० लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना करावी – प्रकाश आंबेडकर

संघर्ष गांगुर्डे 

अकोला – इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड (आय.एम.एफ) मुळे देशातील लॉकडाऊन मध्ये
वाढ करण्यात आली आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून सर्वसामान्यांचे जीवन हे सुरळीत झाले पाहिजे, ही लोकांची भावना आहे. सरकारने लोकांचा अंत पाहू नये तसेच कोरोनाच्या रुग्णांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी मदत केली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून त्यासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजची पुनर्रचना करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे ते पॅकेज निर्मिती (प्रोडक्शन) करणाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे, म्हणून अर्थव्यवस्था मजबूत करायचे असेल तर प्रोडक्शन बरोबरच मागणाऱ्यांची साईड देखील महत्त्वाचे आहे त्याचा विचार केला गेला पाहिजे, मागणारच नसेल तर प्रोडक्शन करून काय उपयोग आहे. म्हणूनच २० लाख कोटींच्या पॅकेजची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. यामध्ये मागणी करणाऱ्या मजूर, मध्यमवर्गी यांचा विचार केला गेला पाहिजे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले
गेल्या सत्तर दिवसांपासून लोक घरांमध्ये कोंडले गेले आहेत, जेल मध्ये माणूस कसा जगतो ते त्यांनी भोगलेले आहे म्हणून लोकांचा अंत सरकारने पाहू नये, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी ही माहिती दिली.

 

Related Posts
Translate »