महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

झोपड्या वाचविण्याचा लढा माझा आहे- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – रेल्वेने घरं रिकामी करण्याच्या रहिवाशांना बजावलेल्या नोटीसांप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मध्यस्थी करावीच लागेल. तसेच महाराष्ट्रातील कायदा महाराष्ट्रातील झोपड्यांना वाचवू शकतो. तर केंद्रालाही हीच भूमिका घ्यावीच लागेल आणि महाराष्ट्रातील कायद्याला मान्यता देऊन सगळ्या झोपड्यांना संरक्षण द्यावेच लागेल अशी भूमिका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. कल्याण पूर्वेत रेल्वेने नोटीसा बजावलेल्या आनंदवाडी परिसरातील रहिवाशांची जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. त्यावेळी या रहिवाशांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

कळव्यातील 35 हजार झोपडीधारकांच्या घरांवर जेव्हा असेच संकट आले तेव्हा आपण 3 तास रेल्वे रोखून धरली होती आणि केंद्र सरकारला आपला निर्णय फिरवण्यास भाग पाडले होते अशी आठवण आव्हाड यांनी करून दिली. तर हा लढा कोणा व्यक्तीविरुद्ध नसून केंद्राविरोधात आहे. हे केंद्र सरकार एवढे निर्दयी कसे होऊ शकते? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्य सरकारच्या जमिनीवरील झोपड्यांना संरक्षण देण्यात आले आहे. केंद्र सरकारने आम्हाला प्रस्ताव दिला तर आम्ही योजना आणू आणि या झोपडीधारकांचे पुनर्वसन करू. या कारवाईत सुमारे पाच लाख लोक बाधीत होणार आहेत. एवढ्या लोकांना घराबाहेर काढण्यासाठी मिलिट्रीला बोलवावे लागेल. हे सर्व गोरगरीब लोकांना घाबरविण्यासाठीच करण्यात आले आहे. आधी घाबरवून सोडायचे आणि नंतर घरं वाचविण्याचे आमीष दाखवायचे हे तंत्र केंद्रातल्या सरकारचे असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.

याठिकाणी राहणारे लोक हे पोटापाण्यासाठी गाव सोडून आले आहेत. इथे थोडेसे सन्मानाने जगण्याची संधी आली असतानाच ही नोटीस आली आहे. पण, नोटीस पाठवणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावे, गरीबी शाप असला तरी गरीब माणूस लाचार नाही. प्रसंगी जीव देऊ पण, घर सोडणार नाही. आता रेल्वेचे विस्तारीकरण नसतानाही जर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तीन तास रेल्वे रोखली तर सबंध देशातील रेल्वे वाहतूक ठप्प होईल, हे ध्यानात ठेवा, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारप्रमाणे केंद्र सरकारने भूमिका घेऊन कायदा करून योजना आखावी आणि पुनर्वसन झाल्या शिवाय नागरिकांवर बेघर होण्याची पाळी येऊ देऊ नये असे आवाहनही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केले.
याप्रसंगी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »