महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र

जिल्ह्यातील ९८०आदिवासींना परत आणण्यात तर परजिल्ह्यातील २२६ आदिवासींना परत पाठविण्यात जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी

    प्रतिनिधी .

    अलिबाग – करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देशात व राज्यात 4 थ्या टप्प्यातील लॅाकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने दि.19 एप्रिल 2020 रोजी राज्यांमध्ये अडकून राहिलेल्या मजूरांना राज्यांतर्गत तसेच इतर जिल्ह्यांमध्ये मूळ गावी प्रवास करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
    त्यानुसार रायगड जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कातकरी आदिवासी कुटूंबासह कोळसा भट्यांवर चार ते पाच महिने स्थलांतरित होतात. राज्यातील बीड, सोलापूर, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात त्यांना कंत्राटदार कामासाठी घेऊन जातात. साधारणत: होळीपासून ते मे महिन्यापर्यंत काम करून ते पावसाळ्यापूर्वी आपल्या जिल्ह्यात परत येतात. मात्र यावर्षी कोरोना विषाणू महामरीमुळे दिनांक-25 मार्च 2020 पासून देशव्यापी लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्व मजूर तिथेच अडकले. त्यांना सुखरूप परत आणणे, हे जिल्हा प्रशासन व आदिवासी विकास विभागासमोर मोठे आव्हान होते.
    राज्यांतर्गंत एकूण तीस ठिकाणी हे आदिवासी बांधव अडकलेले होते. तसेच इतर राज्यांतील कामगार परत आपल्या राज्यात परत घेऊन येण्याकरिता आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने एक योजना तयार झाली. त्यानुसार रायगड जिल्ह्यात अडकलेल्या मजूरांची यादी व इतर राज्यात अडकलेल्या मजूरांची तपशिलवार यादी तयार करण्यात आली.
    या यादीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर आयुक्त आदिवासी विकास श्री.संजय मीणा, प्रकल्प अधिकारी, पेण, कैलास खेडकर, तहसिलदार रोहा श्रीम.कविता जाधव व विभागीय नियंत्रक श्रीम. अनघा बारटक्के यांनी केलेल्या सुनियोजनातून आंध्रप्रदेशमधून 73, कर्नाटकमधून 795 व तेलंगणामधून 112 असे एकूण 980 आदिवासी बांधवांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रोहा व सुधागड तालुक्यात त्यांच्या कुटूंबासह सुखरूप त्यांच्या घरी आणण्यात यश मिळविले.
    तसेच रायगड जिल्ह्यात अडकलेल्या एकूण 125 आदिवासी बांधवांना इतर जिल्ह्यात खाजगी बसने सुखरूप सोडण्यात आले आहे व महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यामधून 101 आदिवासी मजूरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यात आले. या प्रवासादरम्यान त्यांना नाश्ता, पाणी बाटली व मास्क इ. पुरविण्यात आले तसेच संपूर्ण प्रवासाची सोय आदिवासी विकास विभागाने विनामूल्य केली. या विभागाचे प्रकल्प अधिकारी कैलास खेडकर यांनी उत्तम समन्वयकाची भूमिका बजावली. आपल्या घरी सुखरूप आलेल्या आदिवासी बांधवांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

    Related Posts
      Translate »