महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी लोकप्रिय बातम्या

शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून सुरू केले आंदोलन

नेशन न्यूज मराठी टिम.

https://youtu.be/k1jJYv0Vzcg

पंढरपूर – अकलूज टेंभुर्णी या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या रुंदीकरणास त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. येथील शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यामुळे माळीनगर येथील शेतकरी नवनाथ बधे यांनी शेतातच चिता रचून जमीन अधिग्रहण करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना विरोध दर्शवला आहे. योग्य मोबदला द्यावा अन्यथा पेटवून घेण्याचा इशाराही शेतकरी नवनाथ बधे यांनी प्रशासनाला दिला आहे.

माळशिरस तालुक्यातील अकलूज टेंभुर्णी या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जोरदारपणे सुरू आहे. जमीन अधिग्रहण करत असताना शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळाला नाही अकलूज जवळील माळीनगर येथील शेतकरी नवनाथ बधे यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदनाद्वारे पाठपुरावा केला मात्र तरीही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे नवनाथ बडे यांनी स्वतःचीच शेतात स्वतःची चिता रचली व गेल्या दोन दिवसापासून नवनाथ बधे यांनी सरणावरतीच मुक्काम ठोकला आहे. गेल्या दोन दिवसापासून त्यांनी सरणावर बसूनच जेवणही घेत आहेत त्याच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा जिल्हाभर झाली आहे.

शेतकरी नवनाथ बधे यांचे माळीनगर येथे अकलूज टेंभुर्णी महामार्गाचे रुंदीकरणामध्ये 22 गुंठे जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जमिनीच्या अतिक्रमण करत असताना चुकीचे पद्धत वापरली आहे. जमिनीचा मिळणारा कमी असल्याचा आरोप शेतकरी बधे यांनी केला आहे. बुधवारी अतिक्रमण करण्यासाठी प्रशासन अधिकारी हे पोलिस बंदोबस्त घेऊन हजर झाले होते. मात्र त्यावेळी शेतकरी बधे यांनी योग्य मोबदला मिळावा यासाठी सरणावर बसून अधिकाऱ्यांना विरोध केला येत्या दोन दिवसात प्रशासनातील अधिकारी दखल न घेतल्यास चितेवर बसून पेटवून घेण्याचा इशाराही शेतकरी बधे यांनी केला आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »