नेशन न्यूज मराठी टिम.
पंढरपूर – अकलूज टेंभुर्णी या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या रुंदीकरणास त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. येथील शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यामुळे माळीनगर येथील शेतकरी नवनाथ बधे यांनी शेतातच चिता रचून जमीन अधिग्रहण करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना विरोध दर्शवला आहे. योग्य मोबदला द्यावा अन्यथा पेटवून घेण्याचा इशाराही शेतकरी नवनाथ बधे यांनी प्रशासनाला दिला आहे.
माळशिरस तालुक्यातील अकलूज टेंभुर्णी या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जोरदारपणे सुरू आहे. जमीन अधिग्रहण करत असताना शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळाला नाही अकलूज जवळील माळीनगर येथील शेतकरी नवनाथ बधे यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदनाद्वारे पाठपुरावा केला मात्र तरीही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे नवनाथ बडे यांनी स्वतःचीच शेतात स्वतःची चिता रचली व गेल्या दोन दिवसापासून नवनाथ बधे यांनी सरणावरतीच मुक्काम ठोकला आहे. गेल्या दोन दिवसापासून त्यांनी सरणावर बसूनच जेवणही घेत आहेत त्याच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा जिल्हाभर झाली आहे.
शेतकरी नवनाथ बधे यांचे माळीनगर येथे अकलूज टेंभुर्णी महामार्गाचे रुंदीकरणामध्ये 22 गुंठे जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जमिनीच्या अतिक्रमण करत असताना चुकीचे पद्धत वापरली आहे. जमिनीचा मिळणारा कमी असल्याचा आरोप शेतकरी बधे यांनी केला आहे. बुधवारी अतिक्रमण करण्यासाठी प्रशासन अधिकारी हे पोलिस बंदोबस्त घेऊन हजर झाले होते. मात्र त्यावेळी शेतकरी बधे यांनी योग्य मोबदला मिळावा यासाठी सरणावर बसून अधिकाऱ्यांना विरोध केला येत्या दोन दिवसात प्रशासनातील अधिकारी दखल न घेतल्यास चितेवर बसून पेटवून घेण्याचा इशाराही शेतकरी बधे यांनी केला आहे