प्रतिनिधी.
बदलापूर – ठाणे जिल्ह्याला यंदा पाणीकपातीच्या झळा बसण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण यंदा अवघं ४९ टक्केच भरलं आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा भाईंदर,कल्याण डोंबिवली,उल्हासनगर या मोठ्या महापालिकांसह अंबरनाथ नगरपालिका आणि एमआयडीसी, स्टेम या प्राधिकारणांना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी, म्हणजे ४ ऑगस्टला हेच बारवी धरण ओव्हरफ्लो झालं होतं. मात्र यंदा जून आणि जुलै महिन्यात पावसानं दडी मारली असून ऑगस्ट महिना आला तरी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाऊस पडला नाही आणि धरण भरलं नाही, तर आगामी काळात संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीकपातीला सामोरं जावं लागू शकतं. जर येणाऱ्या दिवसात पावसाने धरण क्षेत्रात जोरदार हजेरी दिली तर ठाणे जिल्हाला पाणी कापती पासून दिलासा मिळू शकतो.