महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

कल्याणच्या एनआरसी कामगाराच्या आंदोलनाला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

कल्याण प्रतिनिधी – महागाईने जनता हवालदिल झालेली असताना राज्य सरकारला काही देणेघेणे नाही. मी आणि माझे कुटुंब सुरक्षित राहिले म्हणजे सर्व जनता सुरक्षित असल्याचे विद्यमान सरकारला वाटते हीच आजची परिस्थिती असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर घणाघाती आरोप केले. कल्याणच्या एनआरसी कंपनीच्या कामगाराकडून आपल्या हक्काच्या देण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आंबेडकर यांनी भेट देत वंचित बहुजन आघाडीचा या लढ्याला पाठिंबा असल्याचे सांगितले .

एनआरसी कंपनीतील कामगाराकडून आपल्या हक्काच्या देण्यासाठी आणि राहत्या घरावर कारवाई होऊ नये यासाठी कल्याण मोहने येथे बेमुदत धरणे आंदोल सुरु केलंय .तब्बल 20 दिवसंपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आज प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली . यानंतर त्यांनी  कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी युनियन लढा देत असून त्यांनी न्यायालयातून कामगाराच्या घरावरील कारवाईला स्थगिती मिळविली आहे. त्यांचा लढा योग्य मार्गाने सुरु असून या लढ्याला आपला पाठिबा असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी बोलताना आंबेडकर यांनी सध्या राज्यात वाढलेल्या महागाईवर बोलताना त्यांनी कोरोना संकटात राज्य सरकारने आवश्यक अन्नधान्याचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे होते. म्हणजे आता हा साठा रिलीज करत महागाई आटोक्यात ठेवणे शक्य झाले असते मात्र सभागृहात एकमेकांचे उणे दुणे काढन्याचे गौडबंगाल असल्यामुळेच महागाई वाढत असल्याचा गंभीर आरोप केला .तर ठाकरे सरकारच्या मी आणि माझे कुटुंब योजनेची खिल्ली उडवताना महागाई झपाट्याने वाढत असताना सरकारला केवळ मी आणि माझे कुटुंब इतकीच चिंता आहे. जनता महागाईने होरपळली तरी मी आणि माझे कुटुंब सुरक्षित म्हणजे जनता सुरक्षित असल्याचा गोड गैरसमज करत सरकार राज्य करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.  तर विधानसभेत झालेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शिवसेना कधीही हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नसल्याचे सांगताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांनी देखील भाजपा सरकारला बाबरी मशीद आपल्यामुळेच पाडल्याचा दावा केल्याची आठवण करून देत  बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर समाजवादी आणि सेना हे कायमच वेगवेगळे दिसतील असा दावा केलाय

Related Posts
Translate »