महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स

कोरोना महामारीचा असाही गैरफायदा,भामट्यांनी लांबविले सोन्याचे दागिने

प्रतिनिधी.

डोंबिवली – कोरोना महामारीच्या काळात लोकप्रतिनिधी, नेते-पुढारी, सेवाभावी संस्था, दानशूर मंडळींनी गरीब-गरजूंना अन्न-धान्यासह जीवनोपयोगी वस्तूंचे वितरण करून सेवाधर्माचे पालन केले. आजही अनेक मंडळी लोकांसाठी मदतकार्य करत आहेत. मात्र दुसरीकडे भामट्यांनी सर्वसामान्य असहाय्य पादचाऱ्यांना मदत करण्याच्या भूलथापा देऊन लूट सुरू केल्याचे एका घटनेतून समोर आले आहे.
      कल्याण जवळच्या होमबाबा टेकडी परिसरातील स्नेहवर्धक नगरात राहणाऱ्या संजना लक्ष्मण पोळ (60) या त्यांची बहीण कांताबाई अशा दोघीजणी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास कचोरे गावाजवळील मोहन सृष्टी गृहसंकुला समोरून जात होत्या. इतक्यात 25-30 वयोगटातील अनोळखी तरुणांनी या दोघा बहिणींना अडविले. एक सरदारजी कोरोना महामारीमुळे गरिबांना कपडे, धान्य, पैसे वाटत आहेत, तुम्हीही चला, पण तुम्ही गरीब दिसाव्यात म्हणून गळ्यातील दागिने काढून पर्समध्ये ठेवा, असा सल्ला त्या दोघांनी संजना आणि कांताबाई यांना दिला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या दोन्ही बहिणींनी त्यांच्याकडील जवळपास 27 हजार रुपये किंमतीचे दागिने काढून मोबाईलच्या पाकिटात टाकले व ते पाकीट कापडी पिशवीत ठेवले. मात्र यातील एकाने पिशवीला गाठ मारून देतो, असे सांगून हातचलाखीने दोघींची नजर चुकवून हे सर्व दागिने लांबविले. त्यानंतर या दोन्ही भामट्यांनी तेथून हळूच पळ काढला. थोड्यावेळाने पिशवीतून दागिने गायब झाल्याचे दोघा बहिणींच्या लक्षात आल्यानंतर नजीकच्या चौकीतील पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर यातील संजना पोळ यांच्या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिस ठाण्यात फरार भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts
Translate »