नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पण शिवसेनेच्या विभागणी नंतर दोन्ही शिवसेना गटांना कल्याण लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे. त्यातच स्थानिक उमेदवार वैशाली दरेकर यांना कल्याण लोकसभेची उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. त्यांनंतर उद्धव ठाकरे गटाचे सर्वच कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागले आहेत. स्वतः वरुण देसाई कल्याण लोकसभेत येऊन कामाला लागले आहेत.
पत्रकारांनी याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतर देखील तिकीट कापले जात आहेत.त्यामुळे कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदारांना देखील शंका असेल की माझ्या सोबत असे होईल, त्यामुळे कदाचित त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जात नाही. कल्याण लोकसभेत भाजप आणि शिवसेनेने सर्व्हे केला केलेला सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाही. अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे नेते वरून सरदेसाई यांनी दिलीय.डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची वरून सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर देखील उपस्थित होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेतील वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्याने लोकसभा मतदारसंघात चांगला संदेश दिला
असून त्या विजय होतील असा विश्वास व्यक्त केला.
शिवसेना शिंदे गटाच्या सात खासदारांचे तिकीट कापलं गेलं याबाबत बोलताना वरून सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना टोला लगावलाय .एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या 13 पैकी सात खासदारांची तिकीट कापली गेली ,हा नियतीचा खेळ आहे,त्यांना पश्चाताप होत असेल उद्धव ठाकरे , मातोश्री ची आठवण येत असेल ,2014, 2019 साली या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलावलं जायचं ,स्वतः ठाकरे कुटुंब उपस्थित असायचं रश्मी वहिनी औक्षण करून यांना एबी फॉर्म दिले जायचे ,आता दहा दहा तास वेटिंग करावे लागते त्यानंतर देखील तिकीट मिळत नाही, मातोश्रीवर मिळणारा मान आणि आत्ताच त्यांचं स्थान हे चित्र सगळ्यांना जाणीव झाली असेल. शिवसेना आम्ही पुढे घेऊन जाणार असे म्हणणारे डबल देखील जागा मिळवता येत नाहीत दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी 21 उमेदवारांची घोषणा केली आहे.