महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी देश

महाराष्ट्राच्या पुत्राला कर्तव्यावर असताना वीरमरण

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

धुळे/ प्रतिनिधी – आपल्या जिवाची परवा न करता देशासाठी रक्त सांडण्याकरिता जवान नेहमी तयार असतो. देशातील नागरिकांना शांत झोप लागावी यासाठी ते डोळ्यात तेल घालून पहारा देतात. पण जवाणाच्या आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील जवानाला वीर मरण लाभले आहे. अरुणाचल येथे आपले कर्तव्य बजावल्यानंतर कमलेश कदम यांचा मृत्यू झाला. वीरजवान कमलेश कदम यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चेन्नई ते मुंबई हवाईमार्गाने तसेच मुंबई ते धुळे रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर धुळ्यातील महिंदळे, साक्री रोड येथे शासकीय इतमामात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेरगाव (अरुणाचल प्रदेश) येथील 73 बटालियन सशस्र सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाला वीर मरण आले. कमलेश ज्ञानेश्वर कदम असं या जवानाचं नाव आहे. शहीद जवान हा धुळे जिल्ह्यातील मूळचा गोराणे (ता. शिंदखेडा) येथील आहे. 14 मे रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृत्यू झाला. कमलेश हे कडप्पा (आंध्रप्रदेश) येथे निवडणूक बंदोबस्तावर होते. कर्तव्य बजावून सुट्टी झाल्यानंतर ते आरामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कमलेश कदम यांना वीरमरण आल्याची बातमी त्यांच्या गावी कळताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांच्या घराजवळ मोठी गर्दी केली. कमलेश कदम हे सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. नुकतेच ते धुळ्यात आले होते. आठवड्याभरापूर्वी ते ड्युटीवर गेले होते. मात्र पाच दिवसात त्यांच्या मृत्यूची बातमी गावात धडकल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन जुळी मुलं आहेत. कमलेश कदम यांच्या निधनानंतर त्यांची कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »