महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क राजकीय

काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उबाठावर टिकास्त्र

DESK MARATHI NEWS.
 सोलापूर/प्रतिनिधी – सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस यावेत, यासाठी मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून अडीच वर्ष काम केले, मात्र काहींनी बंगल्यात राहून ‘एफबी’वर सरकार चालवले. घरात बसून ‘फुकट बाबुराव’प्रमाणे सरकार चालत नाही, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उबाठावर केली. सांगोला विद्या मंदिर प्रशाळेच्या मैदानात आयोजित जाहीर आभार सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच महाआरोग्य शिबीरास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सांगोल्याच्या जनतेच्या ह्रदयात आजही शहाजी बापूच आहेत. सांगोल्यातील नेते साधे आहेत, पण काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा असं आहे, चेहऱ्यावर जाऊ नका कारण आपणही इतके वर्ष चेहऱ्यामुळे फसलो, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मागील अडीच वर्षात सांगोला मतदार संघात ५५०० कोटींचा निधी दिला. आजवरच्या इतिहासात इतका निधी कोणीच दिला नव्हता. एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही तर पुढल्या मॅचमध्ये दुप्पट तुटून पडते आणि चॅम्पियन्स ट्रॉफी घरी येते. शहाजी बापू लढवय्ये आहेत. शिवसेनेत जेव्हा उठाव झाला तेव्हा बापू पहिल्या दिवसापासून पहाडासारखे उभे होते. सांगोला दुष्काळमुक्त करण्यासाठी बापूंनी खूप प्रयत्न केले, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, महायुती सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळ कमी करण्यासाठी सिंचन वाढवण्याचा प्रयत्न केले. अडीच वर्षात सरकारने १५० सुप्रमा दिल्या. नुकताच मंत्रिमंडळाने म्हैसाळ उपसासिंचन प्रकल्पासाठी सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी १५०० कोटी मंजूर केले. सांगोल्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पासाठी ८८३.७८ कोटी मंजूर केले. या तालुक्यात सर्वच समाजाच्या कल्याणासाठी बापूंनी कामे केली आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. खुर्च्या बदलल्या तरी मनं बदललेली नाहीत आणि संकल्पसुद्धा बदलले नाहीत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आणखी वेगाने राज्याचा विकास करणार आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याचे काम आपण करत आहोत, असे ते म्हणाले. जगदगुरु तुकाराम महाराज पुरस्कार, महापराक्रमी महादजी शिंदे पुरस्कार, इंडियन एक्सप्रेसकडून देशातील १०० शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करुन केलेला सन्मान हे सर्व पुरस्कार मुख्यमंत्री नसताना मिळालेले असून त्याचे श्रेय जनतेचे आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे आज येथे लोकार्पण झाले. इंदू मिलमध्ये जगाला हेवा वाटेल असे बाबासाहेबांचे स्मारक साकारले जात आहे. बाबासाहेबांच्या जिथे जिथे पाऊलखुणा आहेत, त्यांच्या आठवणी जिवंत करण्याचे काम महायुती सरकारने केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले होते. मात्र बाबासाहेबांच्या विचारांनी आपले सरकार चालत आहे. या राज्यातील गरिब, शोषित, वंचितांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »