महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन

कल्याण प्रतिनिधी– रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष संघटना च्या वतीने छत्रपती शिक्षण मंडळाच्या गैरव्यवहारा विरोधात अभिनव प्राथमिक विद्यामंदिर टिळक चौक कल्याण येथे आर पी आय महिला ठाणे जिल्हाध्यक्षा अपेक्षा दळवी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन घेण्यात आले.

छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेतील शिक्षक नियुक्ती मधील गैरव्यवहार व हुकूमशाही कारभारा संदर्भातील विविध अशा १४ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान संस्थेच्या चिटणीस मीनाक्षी गागरे आणि भारती वेदपाठक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन एका मागणीसंदर्भात लेखी पत्र देण्याचा प्रयत्न केला. त्यावर आंदोलनकर्त्यांनी आमच्या सर्व १४ मागण्यांबाबत काय कारवाई करणार याचे लेखी उत्तर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ठणकावले. अखेरीस संस्थेच्या वतीने येत्या दहा ते बारा दिवसांत कारवाई करण्याचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपसचिव मामा गायकवाड, डी बी एन संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद वानखेडे, कल्याण-डोंबिवली महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts
Translate »