महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या राजकीय

शिवसेना शिंदे गटात कार्यकर्त्यांसोबत मानहाणी होते-निर्मला प्रभावळकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असली तरीही महाराष्ट्रातील राजकारणाचा पारा वाढतच आहे. आज शिवसेना शिंदे गटाचे कल्याण मुरबाड शहराचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन वादाला ठिणगी पडली आहे. विरोधी पक्ष महायुतीवर कडाडून टीका करताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्या निर्मला सामंत प्रभावळकर यांनी अरविंद मोरे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या. “कल्याणच्या जिल्हाप्रमुखांनी राजीनामा दिलेला आहे. शिवसेना शिंदे गटात कार्यकर्त्यांसोबत मानहाणी होते. याचा परिणाम निवडणुकीवर होईल ही चांगली बाब नाहीये. कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहीजे पहिल्या शिवसेनेत जो त्यांना मान मिळत होता जे गद्दार लोक पक्ष फोडून जातात त्यामुळे त्यांना तो मान राहत नाही. याच्यावरुण अरविंद मोरे यांनी धडा घेतला पाहीजे. त्यांच्या प्रमाणे अनेक कार्यकर्त्यांनी देखील यातून धडा घ्यावा आणि ज्याचे नेतृत्व योग्य आहे त्याच्यासोबत जावं.”

निर्मला प्रभावळकर यांनी भाजप आमदार राम कदम यांना टोला लागवला. त्या म्हणाल्या “राम कदम काय बोलले याला काही जास्त महत्व देण्याची गरज नाहीये. ते फ्रस्ट्रेट होऊन ज्या प्रकारे वेगवेगळी कारण देत असतात. ते कधी रडतात तर कधी ते अतिशय लाचार होतात. ते इमोशनल होतात पण त्यांच्या घरातील कोणाला पद मिळालं की त्यांची व्यथा बंद होते. राम कदम हे स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत आहे ते काही पक्षाच्या अस्तित्वासाठी लढत नाही. राम कदम पक्षाला खुश करण्यासाठी सगळं करतात.” वास्तविक घाटकोपला झालेली ही दुर्घटना अतिशय गंभीर आहे त्यावरुन कोणत्याही पक्षाने, नेत्यांनी राजकारण करु नये. राम कदम यांनी त्याच्या मधे असलेली माणुसकी मानवता ती जागृती ठेवावी.” असा सल्ला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्या निर्मला प्रभावळकर यांनी दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »