नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असली तरीही महाराष्ट्रातील राजकारणाचा पारा वाढतच आहे. आज शिवसेना शिंदे गटाचे कल्याण मुरबाड शहराचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन वादाला ठिणगी पडली आहे. विरोधी पक्ष महायुतीवर कडाडून टीका करताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्या निर्मला सामंत प्रभावळकर यांनी अरविंद मोरे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या. “कल्याणच्या जिल्हाप्रमुखांनी राजीनामा दिलेला आहे. शिवसेना शिंदे गटात कार्यकर्त्यांसोबत मानहाणी होते. याचा परिणाम निवडणुकीवर होईल ही चांगली बाब नाहीये. कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहीजे पहिल्या शिवसेनेत जो त्यांना मान मिळत होता जे गद्दार लोक पक्ष फोडून जातात त्यामुळे त्यांना तो मान राहत नाही. याच्यावरुण अरविंद मोरे यांनी धडा घेतला पाहीजे. त्यांच्या प्रमाणे अनेक कार्यकर्त्यांनी देखील यातून धडा घ्यावा आणि ज्याचे नेतृत्व योग्य आहे त्याच्यासोबत जावं.”
निर्मला प्रभावळकर यांनी भाजप आमदार राम कदम यांना टोला लागवला. त्या म्हणाल्या “राम कदम काय बोलले याला काही जास्त महत्व देण्याची गरज नाहीये. ते फ्रस्ट्रेट होऊन ज्या प्रकारे वेगवेगळी कारण देत असतात. ते कधी रडतात तर कधी ते अतिशय लाचार होतात. ते इमोशनल होतात पण त्यांच्या घरातील कोणाला पद मिळालं की त्यांची व्यथा बंद होते. राम कदम हे स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत आहे ते काही पक्षाच्या अस्तित्वासाठी लढत नाही. राम कदम पक्षाला खुश करण्यासाठी सगळं करतात.” वास्तविक घाटकोपला झालेली ही दुर्घटना अतिशय गंभीर आहे त्यावरुन कोणत्याही पक्षाने, नेत्यांनी राजकारण करु नये. राम कदम यांनी त्याच्या मधे असलेली माणुसकी मानवता ती जागृती ठेवावी.” असा सल्ला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्या निर्मला प्रभावळकर यांनी दिला आहे.