महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

ग्रामविकास विभागाकडून ५० लाखांचा निधी देणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी – कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी ग्रामविकास विभागाकडून 50 लाख रूपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कळंबे तर्फ ठाणे येथील ग्रामपंचायतीच्या नवीन प्रस्तावित इमारतीचे भूमीपूजन श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते .व्यासपीठावर खा. संजय मंडलिक, आ. ऋतूराज पाटील, सरपंच सागर भोगम, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, सदस्य सर्वश्री शशिकांत चुयेकर, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, करवीर पं.स. सभापती मंगल पाटील, आदी उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, गटविकास अधिकाऱ्यांनी मनरेगामधून पाणंद रस्ते निर्मितीचे नियोजन करावे. राज्यातील 4 लाख 20 हजार असंघटीत कर्मचाऱ्यांना आपल्या विभागामार्फत संरक्षण देण्याचा आपला मानस आहे. हदवाढ भागात समाविष्ट होण्यासाठी कळंबे गावातील ग्रामस्थांनी सकारात्मकतेने विचार करावा, असे आवाहन करून उपस्थित नागरिकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.तर पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ग्रामपंचायत ही ग्राम विकासाचे द्वार दाखवणारी संस्था आहे. कळंबे गावच्या विकासासाठी आर्थिक निधी कमी पडू देणार नाही. ग्रामपंचायतीच्या नूतन इमारत उभारणीकरिता 25/15 योजनेंतर्गत 50 लाखांचा निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून विद्यमान खासदारांनी या प्रस्तावित इमारतीसाठी 25 लाखांचा निधी दयावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी कोविडचा पहिला डोस घेतला नाही, अशा नागरिकांनी स्वतःचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले .

याप्रसंगी खा.संजय मंडलिक,आ .ऋतूराज पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून ही नूतन इमारत लवकरच उभारण्यात येणार आहे. याप्रसंगी महसूल विभागाकडून प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना 7/12 उताऱ्याचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी उपसरपंच शालिनी पाटील, नगरसेवक शारंगधर देशमुख, मिनाक्षी पाटील यांच्यासह, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच श्री. भोगम तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक दिलीप तेलवी यांनी केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »