महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची पूरग्रस्त भागाची पाहणी

नेशन न्यूज मराठी टीम.

जळगाव / प्रतिनिधी – सूरू असलेल्या संततधार पाऊसा मुळे तापी आणि पूर्णा नदी ओसंडून वाहत असल्या कारणाने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून हजारो लिटर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

बऱ्हाणूपर शहरालगतच्या इंदूर – अमरावती महामार्गावरील जुन्या पुलावरून पुराचे पाणी जात होते. परिणामत: तालूक्यातील तापी नदी काठच्या नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर गावांचे रस्ते व पुलांवर या धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी शिरून परिसराला वेढा पडल्याने या सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तापी नदीच्या महापूरातील बॅकवॉटरखाली नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर शिवारातील सुमारे २०० हेक्टर शेतजमीनीतील खरीपाची व बागायती केळी तथा फळबागा बुडाल्याने शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. एनपुर, निंबोल, विटवा व इतर गावात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असुन

प्रशासनाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बॅक वॉटर चे पाणी घरांमध्ये व शेती शिवारात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी एनपुर येथे भेट देउन महापुराची पाहणी केली.

सतंतधार पाऊसाने घरांची पडझड झाली असून पुराचे पाणी घरात घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.रोहिणी खडसे यांनी एनपुर येथे पुराची पाहणी करून नागरिकांना धीर दिला तसेच रावेर तहसीलदार यांच्या सोबत दुरध्वनी वरुन नागरीकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्या बाबत चर्चा केली.नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये तसेच पुर असताना नदी नाले ओलांडू नये असे रोहिणी खडसे यांनी नागरिकांना आवाहन केले

यावेळी प स सदस्य दिपक पाटील, सरपंच अमोल महाजन, किशोर पाटील, अरविंद महाजन , मोहन कचरे, सलमान खान, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »