महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली पूर्वमध्ये असणाऱ्या एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत काल मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की काही क्षणातच कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. आगीनं रौद्ररूप धारण करत आसपासच्या तीन ते चार कंपन्याही आपल्या जवळ घेतल्या. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहे. स्फोटामुळे डोंबिवली आणि आजूबाजूचा परिसर हादरला. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटामुळे डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्यात.

या अग्नितांडवात आता पर्यंत मृतांचा आकडा ९ वर पाेहचला असून जखमींची संख्या एकूण ६५ झाली आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफचे पथक व अग्निशामक दलाचे रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. एमआयडीसी फेज मधील म्हात्रे पाडा, रिजेंसी इस्टेट, एमआयडीसी निवासी, सोनार पाडा इत्यादी भागात नुकसान झाले आहे. स्फोट झालेल्या परिसरातील नागरीक भयभयीत झाले आहे. काही महिन्याच्या अंतराने दुर्घटना होत असल्याने नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच बरोबर झालेल्या जिवित हानीला जबाबदार कोण? झालेल्या दुर्घटनेची जास्तीत जास्त दखल घेऊन कसूरवारास योग्य ती शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Posts
Translate »