Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त गावांना चारीद्वारे पाणी सोडा; शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

नेशन न्यूज मराठी टीम.

अहमदनगर / प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना आता तरी भोजापूर चारीद्वारे पाणी सोडा अशी आग्रही मागणी संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागातील गावे नान्नज दुमाला बिरेवाडी,काकडवाडी, सोनोशी पारेगाव खुर्द, तिगाव इत्यादी गावांच्या शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे.

ह्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भोजापुर कोरड्या चारीची पाहणी केली. जोपर्यंत भोजपुरी चारीद्वारे पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही येणाऱ्या काही दिवसात आमरण उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे येथील शेकतऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी भोजपुर पाण्यापासून वंचित असलेल्या सर्वच गावातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना शेतकरी पांडूरंग फड ,किसन चत्तर,दत्तू फड भोजापूरचे पाणी मिळण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X