महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मोबदल्यात बाबत आ. राजू पाटील यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – केंद्र शासनाच्या महत्वकांशी असलेल्या बुलेट ट्रेन भूसंपादनात मोठा घोटाळा झालाय. रस्त्यावरील ताडपत्रीच्या घरांना शासनाकडून १४ लाखांचा मोबदला दिला जातो,अन सातबाऱ्याच्या स्वतःच्या सातबाऱ्याच्या जागेत घर असलेल्या भूमिपुत्रांना सात लाखांचा मोबदला दिला जात आहे. या संदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भूमिपुत्र शेतकऱ्यांसह भेट घेत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवला आहे. 

केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी असलेला  बुलेट ट्रेन प्रकल्प हा कल्याण ग्रामीण विधानसभेतून जात आहे. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातील बहुतांश भूमिपुत्रांच्या जमिनी या बाधित होत आहेत. मात्र या शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय देण्याचे प्रताप सध्या शासन दरबारी सुरु आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेत आपली कैफियत मंडली होती. या नंतर शुक्रवारी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सोबत ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला आहे. या संदर्भात तातडीने बैठक घेऊन कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आमदार राजू पाटील यांच्यासमोर दिली आहे.

या संदर्भात आमदार राजू पाटील म्हणाले कि,जेव्हा भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली त्यावेळेस भूधारकांना चांगला मोबदला मिळतोय म्हणून शेतकरी शासनानला जमीन द्यायला आले. अश्या वेळेस एक लॉबी तयार झाली जी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ज्यात शेतकरी असतील किंवा जिथे सावकार जागा असतील, त्या सावकारांना जागा माहिती नसतील त्यांना फक्त पीकपाणी लागलं होत सातबाऱ्यांवर तिथे सावकारांना ५०-५० टक्के पैसे द्यावे लागले. बऱ्याच ठिकाणी जिथे सावकार असतील किंवा गुरचरण असतील जिथे अनेक ठिकाणी बांधकामे नव्हती. तिथे बांधकामे दाखवण्यात आली आणि अश्या प्रकारचा मोठा घोटाळा इथे झालेला आहे. इथे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मी स्वता शेतकऱ्यांना घेऊन आलो होतो तिथे शेतकऱ्यांची स्वतःची जागा आहे.स्वतःच्या चाळी आहेत.आरसीसी स्ट्रक्चर आहेत. त्यांना सहा लाखांच्या आसपास मोबदला दिला जातो. अन शिळफाट्याला बंगाली बाबाची ताडपत्रीची घर होती. त्यानं सरकारी जागेवर ताडपत्रीची घर बांधली त्यांना १४ लाखांचं मोबदला दिला जातोय. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. खरतर केंद्र शासनाचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यानं लवकर करायचा असेल तर त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. त्याचे महाराष्ट्रातील जे पाठीराखे आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. याच्यात ज्या प्रमाणे घोळ झाला आहे त्या प्रमाणे एसआयटी स्थापन करून या अधिकाऱ्यांना किंवा दलालांना यांना उघडे केले पाहिजे. आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो होतो त्यानी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते आम्हाला न्यायालयात जायच्या आधी बैठक घेतील. सोमवार किंवा मंगळवारी बैठक होईल तेव्हा बघू काय दिलासा मिळतो का ? नाहीतर आम्ही याच्या विरोधात आंदोलन देखील करू,ज्या व्यासपीठावर न्याय मागायचा आहे तिथे न्याय देखील मागू पण आमच्या भूमिपुत्रांना रस्त्यावर येऊ देणार नाही त्यांना त्यांचा योग्य मोबदला घेऊन देणारच अशी प्रतिक्रिया मनसे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांसह शेतकरी देखील उपस्थित होते.       

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »