महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र

रत्नागिरी पावसाळापूर्व आपत्ती आराखडा बैठक वाहतूक सुरळीत ठेवा – जिल्हाधिकारी

प्रतिनिधी.

रत्नागिरी – येणाऱ्या पावसाळयाच्या कालावधीत रस्ते वाहतूक सुरळीत राहिल या दृष्टिकोणातून नियोजन करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत. पावसाळापूर्वीच्या आपत्ती आराखड्याचा आढावा जिल्हाधिकारी मिश्रा यांनी घेतला.
या आढावा बैठकीस अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुळकर्णी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सुर्यवंशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हयात पावसाळयात निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये नद्यांना येणाऱ्या पूराचा व दरडी कोसळण्याच्या घटनांचा प्रामुख्याने समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ज्या ठिकाणी पूल आहेत त्या ठिकाणी पूरस्थितीत करायच्या वाहतूक नियंत्रणाबाबत यावेळी चर्चा झाली.
रस्त्याच्या रुंदीकरण कामामुळे अनेक ठिकाणी मातीचे भराव रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात आलेले आहेत. हे भराव पावसाने वाहून रस्त्यांवर येणे आणि त्यामुळे चिखल होवून वाहतूकीला अडथळा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संबधित कंत्राटदारांनी पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना त्यांना देण्यात याव्यात व विनाखंड वाहतूक सुरु राहील याकडे लक्ष द्यावे असे जिल्हाधिकारी म्हणाले.
परशुराम घाटात दरडी कोसळल्याने गेल्या वर्षी वाहतूक खोळंबली होती. यासह कुंभार्ली घाट तसेच कशेडी घाट आणि आंबा घाट यासर्व ठिकाणी वाहतूक सुरळीत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसासोबत खरीप हंगामातील पेरणीला आंरभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा पुरवठा वेळेत होईल याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिल्या.
यंत्रणा तयार करा
जिल्हा भूंकप प्रवण क्षेत्रात समाविष्ट झाल्याच्या सूचना 3 वर्षांपूर्वी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हयात भूकंपमापन यंत्रणा स्थापन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोणातून आवश्यक यंत्रांची खरेदी करुन त्या यंत्रणेला भारतीय हवामान खात्याशी संलग्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हयातील राजापूर तसेच चिपळूण आणि खेड शहरात अनेकदा पाणी शिरते. या ठिकाणांवर नागरिकांच्या सुविधेसाठी असणाऱ्या बोटीची खरेदी देखील करण्यात यावी असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.
गेल्या वर्षी तिवरेची दुर्घटना घडली होती. त्यामुळे यंदा पावसाळयापूर्वी सर्व धरणांची पुन्हा क्षमता तपासणी व योग्य ती दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.

Related Posts
Translate »