महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय व्हिडिओ

सोलापूर-पुणे हायवेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

प्रतिनिधी

सोलापूर – केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत.यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर-पुणे हायवेवर सावळेश्वर टोल नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून सरकारने आंदोलनाची दखल नाही घेतल्यास तीव्र आंदोलने करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे .
यावेळी सोलापूर-पुणे हायवे रोड काही काळासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यानी रोकून धरला होता.या आंदोलनात लांबोटी येथील ब्रम्हा चिट्टे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहभागी झाले होते.यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकारने लोकसभेत व राज्यसभेत शेतकरी विरोधातील कायदे केले आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना काही कार्पोरेट कंपन्यांचे गुलाम बनून राहावे लागेल.सर्व सामान्य शेतकरी उध्वस्त होतील.हा कायदा करून सरकार शेतकऱ्यांच्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे.परंतु शेतकरी हितासाठी हे कायदे रद्द करावे.दिल्लीत या 3 काळ्या कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांच्या संनदशील अहिंसेच्या मार्गाने मागील 70 दिवसापासून आंदोलन सुरू असून केंद्र सरकार शेतकऱ्यांवर लाठीचार्ज,पाण्याचे फवारे,अश्रूधुर तसेच शेतकऱ्यांवर खलिस्तानी,नकक्षलवादी,देशद्रोही असे आरोप लावून आंदोलन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.परंतु शेतकरी विरोधातील कायदे रद्द करून सर्व पिकांना कायदेशीर हमीभाव जाहीर करेपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही.केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने यापेक्षा ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे,जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील,ब्रम्हा चिट्टे,श्रीपती धुणे,पिलांनी शेख,सनी पाटील,बापू वाघमोडे,प्रकाश तांबे,बाळू गोवर्धन,प्रकाश पाटील,नानासाहेब सावंत,शत्रूघन धोत्रे,सागर काळे,पप्पू कदम,नवनाथ मसलकर,अमोल पाटील,अमोल अदमाने,पप्पू सावंत,लक्ष्मण पाटील आदीसह मोहोळ तालुक्यातील विविध गावचे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Related Posts
Translate »