महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

रासप-आपचे तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

धाराशिव / प्रतिनिधी – तेरणा धरणातून पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तेर, ढोकी, येडशी, तडवळा ही चार गाव पाणी पुरवठा योजना अंतर्गत पाईपलाईन सह राबवली. चढ उताराच्या गावात ही योजना व्यवस्थित न राबल्याने ग्रामपंचायतीने ती ताब्यात घेतली नाही. त्यामुळे ग्रा. प. पाणीपट्टीपेक्षा ५ पट प्राधिकरण पाणीपट्टी थकली आहे.

परिणामी वीजबिलामुळे ही योजना बंद पडली. पुढे शासनाने वीजबिल माफ करत ही योजना चार ग्रामपंचायतीत सुकाणु समिती स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग केली. मात्र अंतर्गत अडचणी कायम राहिल्या. हस्तांतरित करताना किमान सहा महिने योजना जीवन प्राधिकरणाने चालवून दाखवण्याची अट असल्याचे सुकाणु समितीचे श्रीमंत फंड यांनी सांगितले. प्रशासनाच्या या खेळात जनता भरडत असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन देवकते व आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली आज तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सध्या ही योजना सुकाणु समितीकडे असुन यंत्रणेच्या वस्तू चोरीला गेल्याने समितीने त्या वस्तु दिल्यास योजना सुरू होईल, असे म्हणत अंग झटकले आहे. तर समिती त्यासाठी प्रयत्न करत असून तीन महिन्यांत योजना सुरू करू असे सांगण्यात आले आहे. मात्र योजनेच्या पाईपलाईमधून कसं व कधी पाणी मिळणार हे पाहणे आवश्यक आहे. मात्र तीन महिन्यांत ही योजना चालू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा रासप व आपने दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »