महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

महाराष्ट्र्राच्या आध्यात्मिक राजधानीत रंगलाय निवडणुकीचा रिंगण सोहळा

सोलापूर/अशोक कांबळे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणूक लागली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कै.भारत भालके यांचे पूत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळाली आहे तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी मिळाली आहे.या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके व भाजपचे समाधान आवताडे यांच्यात तुल्यबळ लढत होईल असे मानले जात आहे.या निवडणुकीत एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरा मध्ये सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा रिंगण सोहळा रंगला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडणार की राहणार याची चर्चा रंगली असताना पंढरपूरच्या निवडणुकीत भाजपचे आमदार 105 वरून 106 होणार का अशी चर्चा रंगली आहे.
या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके भाजपाचे समाधान आवताडे,बहुजन विकास आघाडीच्या शैला गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे,वंचित बहुजन आघाडीचे बिराप्पा मोटे,महाराष्ट्र विकास आघाडीचे संजय माने,बळीराजा पार्टीचे राजाराम भोसले,बहुजन महापार्टीचे सिद्धेश्वर आवारे,अपक्ष सिद्धेश्वर आवताडे,अभिनेते अभिजित बिचकूले, संतोष माने,संदीप खरात,नागेश पवार,सुनील गोरे,सीताराम सोनवले,सुदर्शन खंदारे,कपिलदेव कोळी,सुदर्शन मसुरे,बिरुदेव पापरे हे 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे भारत भालके यांनी 90,787 मते घेऊन विजय मिळवला होता.भालके यांचे प्रतिस्पर्धी सुधाकरपंत परिचारक यांना 75,623 एवढे मताधिक्य मिळाले होते तर अपक्ष उमेदवार समाधान आवताडे 54,124 मताधिक्य घेऊन तिसऱ्या स्थानावर होते.काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उभा केला होता पण भारत भालके यांना मिळणाऱ्या मताधिक्यावर त्याचा परिणाम झाला नव्हता.या मतदार संघात लोकांचा जनाधार असणारे व 2019 साली एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे भारत भालके व सुधाकरपंत परिचारक या दोन्ही नेत्यांचे अकाली निधन झाले असल्याने जनता कोणाच्या पाठीशी उभी राहिली हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
सध्याच्या होत असलेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना मतदारांची भावनिक सहानभूती आहे.या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या शैला गोडसे याही विजयाचा दावा करीत आहेत.असे असले तरी शैला गोडसे व अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांच्या मताधिक्याचा फटका राष्ट्रवादी व भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पण प्रत्यक्षात कोणाला फटका बसला. हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे,वंचित बहुजन आघाडीचे बीराप्पा मोटे यांच्या मताधिक्यावर भगीरथ भालके,समाधान आवताडे यांचा विजय अवलंबून असणार आहे.असे राजकीय विश्लेषकाना वाटते.भाजपचे समाधान आवताडे यांचा विजय परिचारक गटावर अवलंबून असून गेल्या निवडणुकीत परिचारक यांना मिळालेली मते समाधान आवताडे यांना मिळाली तर ते विजयाच्या समीप जावू शकतात.आवताडे यांचा विजय सर्वस्वी परिचारक गटावर अवलंबून असणार आहे.पंढरपूर मतदारसंघात प्रभावी गट असणारा कल्याणराव काळे यांचा गट कोणाच्या पाठीमागे उभा राहतो याच्यावर बरेचसे अवलंबून असणार आहे.कै.भारत भालके यांनी या मतदारसंघाचे गेली अनेक वर्षे नेतृत्व केले आहे. त्याचा फायदा भगीरथ भालके यांना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.असे असले तरी सर्वच उमेदवार विजयाचा दावा करीत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »