महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे थोडक्यात

आपत्तीग्रस्तांचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या- खासदार बाळ्या मामा यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

DESK MARATHI NEWS ONLINE.

भिवंडी/प्रतिनिधी -अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यातील भिवंडी : ४ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व वादळ वाऱ्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी,वाडा,शहापूर,मुरबाड व कल्याण तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या शेतीसह नागरिकांच्या मालमत्ता व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व सामान्य नागरिक संकटात सापडले असून आपत्तीग्रस्तांचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांसह सर्वच आपत्तीग्रस्तांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सोमवारी शहापूर मधील नुकसानग्रस्त भागांना आपण स्वतः भेटी दिल्या होत्या.यावेळी येथील तहसीलदारांना दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानग्रस्तांचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तत्काळ प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शहापूर प्रमाणेच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकरी व सामान्य नागरिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.त्यामुळे या सर्वांचेच पंचनामे शासकीय यंत्रणांनी लवकरात लवकर करून त्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आपण ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून या संदर्भात लवकरच पालकमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आपण भेट घेणार आहोत अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »