महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यात वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

DESK MARATHI NEWS.

पालघर/प्रतिनिधी  – शुक्रवारी (२३ मे ) दिवसभर पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पावसाने वीज वितरण यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. परिणामी बाधित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करत अहोरात्र काम करून शनिवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी वीजुपरवठा सुरळीत केला. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी स्वत: उपस्थित राहत शनिवारी दिवसभर दुरूस्तीच्या कामांबाबत अत्यावश्यक निर्देश दिले.

शुक्रवारच्या वादळी पावसाने ३३ केव्ही विक्रमगड वीज वाहिनीवरील आठ खांब सावडे गावाजवळ जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे ३३/२२ केव्ही विक्रमगड उपकेंद्र शुक्रवारी सायंकाळपासून बंद आहे. या उपकेंद्रावरून निघणारे ११ व २२ केव्हीचे भोपोडी, चिल्लर, वाडा, हमरापूर, वासा उपकेंद्रवारील ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. तर मनोर गावाजवळ चार खांब तर जव्हार ते मोखाडा वीज वाहिनीचा एक खांब पडला होता. या आपत्तीत उच्चदाब व लघुदाब वाहिनीचे एकूण ४० विजेचे खांब कोसळले होते. सोबतच विविध भागात वृक्ष उन्मळून पडल्याने व झाडांच्या फांद्या पडल्याने वीजवाहिन्या बाधित झाल्या होत्या.

मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा हे स्वत: शनिवारी सकाळपासून पालघरमध्ये ठाण मांडून आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी दुपारपासूनच शक्य तितक्या तातडीने दुरुस्तीचे काम करून बाधित वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचित करत प्रत्येक बाबींवर ते  बारकाईने लक्ष ठेवून होते. विपरित परिस्थितही महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नोंदणीकृत कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी अविरत काम करत बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. ३३/२२ केव्ही विक्रमगड उपकेंद्राकडे जाणाऱ्या वीजवाहिनीचे सर्व खांब उभे करण्यात आले असून शनिवारी सायंकाळपर्यंत विक्रमगडचा वीजपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित आहे. नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »