महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर मुख्य बातम्या

निरंकारी सद्गुरुंनी विरार नगरीत दिला एकत्वाचा दिव्य संदेश

नेशन न्यूज मराठी टीम.

विरार/प्रतिनिधी – ‘‘ब्रह्मज्ञानाद्वारे जेव्हा ईश्वराची ओळख होते आणि क्षणोक्षणी त्याच्या जाणीवेमध्ये जीवन जगले जाते तेव्हा आपसूकच मानवतेचे गुण जीवनात प्रविष्ट होतात.” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी विरारमधील विवा कॉलेजच्या पाठीमागील मैदानावर सोमवारी सायंकाळी आयोजित केलेल्या विशाल एक दिवसीय निरंकारी संत समागमात उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.

      सद्गुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित करण्यात आलेल्या या संत समागमात पालघर, नाशिक, मुंबई व ठाणे जिल्ह्यातील हजारों भाविक-भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जन सहभागी झाले होते. समागमाला आलेल्या विशाल जनसागराने मैदानाचा कानाकोपरा फुलून गेला होता आणि भक्तीभावनेने ओतप्रोत झालेले समागम स्थळाचे विहंगम दृश्य अत्यंत मनमोहक होते. 

      संत समागमाच्या दरम्यान निरंकारी राजपिताजी यांनी आपले भाव व्यक्त करताना मुख्य मंचाच्या वर अंकित असलेल्या सम्पूर्ण हरदेव बाणीतील – ‘कहे हरदेव झूठ से बचकर सत्य सदा अपनाना है’ या ओळी उद्यृत करुन सांगितले, की इथे अशा असत्य गोष्टीकडे लक्ष वेधले जात आहे जी मनुष्य सत्य मानून चालला आहे आणि अशा असत्यावर आधारित जीवन जगत आहे. खरं तर खोट्याला खरं मानणं हे काही सूज्ञपणाचं लक्षण नाही; परंतु तरीही मनुष्य खोट्यालाच खरे मानत आहे ही मोठी विडंबना आहे. सद्गुरुचा हा फार मोठा परोपकार आहे ज्यायोगे आज सत्य घरोघरी पोहचत आहे आणि इतका मोठा मानव परिवार या सत्याच्या प्राप्तीनंतर आपल्या जीवनात परिवर्तन घडवून इथे उपस्थित झाला आहे.

      विरारमध्ये आयोजित या भ्रव्य-दिव्य संत समागमात जनार्दन पाटील (झोनल  इंचार्ज, नाशिक झोन) यांनी सद्गुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांच्या प्रति समस्त भाविक-भक्तगणांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. तसेच स्थानिक प्रशासन व अन्य सरकारी विभागांचे त्यांच्या पूर्ण सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »