महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजडेस्क

केडीएमसीचे नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी आयुक्तपदाचा स्विकारला पदभार

DESK MARATHI NEWS ONLINE.

कल्याण/प्रतिनिधी– कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी आज आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्विकारताच त्यांनी  माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. कल्याण डोंबिवलीत शिक्षण आरोग्यासह नागरिक केंद्रीत कारभाराला प्रथम प्राधान्य राहील असा विश्वास कल्याण डोंबिवलीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.

या अगोदर त्यांनी धुळे आणि हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून आणि लातूर जिल्हा परिषदेमध्ये सीईओ म्हणून त्यांनी काम केलेले आहे.पण  यापेक्षा कल्याण डोंबिवली ही शहरे सर्वाधिक नागरीकरण झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर अगोदर आपल्याकडे क्षेत्रात कोणकोणत्या समस्या आहेत, त्याचबरोबर कोण कोणते प्रकल्प सुरू आहेत त्यांना गती देण्याचा आपला प्रयत्न असेल. तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासन लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने 100 दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये नागरिककेंद्रीत प्रशासकीय कामकाजासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले.

नागरिकांच्या तक्रारी असो की त्यांना मिळणाऱ्या सेवा. त्या अधिकाधिक गतीने, पारदर्शकपणे त्यांना कशा देता येतील यासाठी काही सिस्टम्स डेव्हलप करायचे आहेत. आज टेक्नॉलॉजीचे प्रमाणही वाढलेले असल्याने एआयचाही वापर करण्याचा आपला प्रयत्न राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.तर आपण सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असल्याने कल्याण डोंबिवलीतील पायाभूत सुविधा आणि इतर कामांवरही आपले विशेष लक्ष राहणार असल्याचे सांगत नवनियुक्त आयुक्त गोयल यांनी आपल्या कारभाराची दिशा यावेळी स्पष्ट केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त संजय जाधव आदी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »