महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

भिवंडीत रेल्वे प्रकल्पाच्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ?

भिवंडी प्रतिनिधी – भिवंडी – वसई रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मार्गावर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने पनवेल -भिवंडी – वसई या मार्गावर दोन नव्या रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरु आहे. सध्या या मार्गात जमीन अधिग्रहण व माती भराव असे काम सुरु आहे. मात्र माती भराव करणाऱ्या ठेकेदारांनी नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही दखल घेतली नसल्याची बाब समोर आली आहे.   भिवंडीतील वडघर गावात रेल्वे प्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र याठिकाणी माती भराव करणाऱ्या प्रसाद रोड्स अँड इन्फ्रा प्रा ली. कंपनीच्या कंत्राटदाराने वडघर येथील स्मशान भूमीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला खोदकाम करून त्यात भरणी केली नाही. विशेष म्हणजे माती भराईसाठी खोदलेल्या या खड्ड्यात कंत्राटदाराने माती भराई केली नाही त्याच बरोबर कोणत्याही प्रकारची सुरक्षा देखील या खड्डयाभोवती केलेली नाही. त्यातच मागील आठवड्यात पडलेल्या पावसात हा खड्डा पाण्याने पूर्ण भरला असून या खड्ड्याला तलावाचे रूप आले आहे, विशेष म्हणजे या खोदकामाच्या बाजूला नागरिकांची घरे असून लहान मुले या खड्ड्यात दगड फेकायला जात आहेत , भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

त्याचबरोबर या मार्गावर खारबाव तसेच भिवंडी रोड रेल्वे पुलाचे त्याच बरोबर छोट्या मोठ्या मोरीपूल तसेच वडघर येथील स्मशान भूमीजवळील पुलाचे काम देखील अपूर्ण आहे. मात्र ही कामे अपूर्ण असतांनाही या मार्गावर माती भराव करण्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने वडघर येथे मोठ्या प्रमाणात माती भराव करण्यात सुरुवात केली आहे. हे माती भरावाचे काम करतांना संबंधित कामाचा ठेका घेणाऱ्या प्रसाद इन्फ्रा या कंपनीने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यात पाण्याच्या निचरा होण्याकडे पुरता दुर्लक्ष करून माती भराव केल्याने याठिकणी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. त्याकडे देखील ठेकेदारांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बेजबाबदारपणे माती भरावाचे काम करणाऱ्या प्रसाद रोड अँड इन्फ्रा या ठेकेदाराला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना द्याव्यात नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश करावे अशी मागणी वडघर ग्रामस्थांनी भिवंडीचे प्रांताधिकारी यांच्यासह तहसीलदार यांच्याकडे केली आहे. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »