महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

भाजप पदाधिकारी माळीविरोधात राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

नेशन न्यूज़ मराठी टीम.

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कधी काळी जो सर्वात मागासलेला परिसर होता तो कळवा मुंब्रा मतदारसंघ डोंबिवलीपेक्षा लाख पटीने बरा असून इथल्या उच्चशिक्षीत, सुसंस्कृत मतदारांच्या सहनशीलतेला आपला सलाम असल्याची शालजोडीतील बोचरी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप पदाधिकारी संदीप माळी याच्याविरोधात डोंबिवली पूर्वेला धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आव्हाड यांनी ही टिका केली. या आंदोलनाला डोंबिवली शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

एकीकडे आमच्या कार्यकर्त्यांवर लहान सहान गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना तडीपारीची नोटीस दिली जाते आणि इकडे भाजप पदाधिकारी संदीप माळीवर २२ गुन्हे दाखल असूनही तो मोकळा फिरतो, इकडे कायद्याचे राज्य आहे की नाही असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. तर हिटलरने ज्याप्रमाणे स्वतःची आर्मी स्थापन केली होती तसाच प्रकार आपल्याला ठाण्यामध्ये होताना दिसत असल्याचे सांगत राजकीय दहशत पोलिसांच्या मार्फत तयार केली जात असल्याचा गंभीर आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला.

तर शिवाजी पार्क शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध आणि संदर्भ नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. शिवाजी पार्क, शिवतीर्थ, शिवसेना आणि दसरा मेळावा हे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे समीकरण तयार झाले आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा देणारे बॅनर लावले याचा अर्थ आमचाही त्यात सहभाग असेल असा होत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत बोलताना आव्हाड यांनी इथल्या डोंबिवलीच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विशेषणांचा दाखल देत त्यांनी इथल्या मतदारांच्या सहनशीलतेवर शालजोडीतून अत्यंत बोचरी टिका केली. सांस्कृतिक शहर, विद्येचे माहेरघर, उच्च विद्यावभूषितांची, साहित्यिकांची नगरी अशी ओळख असणाऱ्या डोंबिवलीकरांच्या मतदानाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रवक्ते महेश तपासे, कार्याध्यक्ष वंडार पाटील यांच्यासह, शहराध्यक्ष सुरेश जोशी, शिवसेनेचे सदानंद थरवळ, काँग्रेसचे संतोष केणे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सारिका गायकवाड आदी पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »