महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

तिरंगा झळकावित ७.५ कि.मी.च्या स्वच्छता संदेश प्रसारक मानवी साखळीची राष्ट्रीय विक्रमात नोंद

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आनंदाने साजरे करताना पामबीच मार्गावर महापालिका मुख्यालयापासून मोराज सर्कल सानपाडा पर्यंत 7500 मीटरचा अर्थात 7.5 कि.मी.ची मानवी साखळी करून तिरंगा झळकवत 8 हजारहून अधिक नवी मुंबईकर नागरिकांनी देशभक्तीसह स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला. या अभिनव उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या विविध क्षेत्रातील विक्रम नोंदविणा-या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेस या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत राष्ट्रीय विक्रम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले आहे. ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ चे परीक्षक बी.बी. नायक यांनी हे प्रमाणपत्र व मेडल राजीव गांधी स्टेडीयममधील विशेष कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे प्रदान केले.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या स्वच्छ अमृत महोत्सव कालावधीत “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामधील एक आगळावेगळा उपक्रम आज नवी मुंबईचा क्विन्स नेकलेस म्हणून ओळखल्या जाणा-या पामबीच मार्गावर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिला बचत गट, महिला संस्था, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी, पोलीस ॲकॅडमीचे प्रशिक्षणार्थी आणि लोकप्रतिनिधी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. पाऊस असूनही तिरंग्याचा यथोचित सन्मान राखला जाईल याची संपूर्ण काळजी घेत या मानवी साखळीमध्ये सहभागी 8 हजारहून अधिक नागरिकांनी देशप्रेमाचे अनोखे दर्शन घडविले.

नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यामध्ये विशेषत्वाने महिला कर्मचा-यांनीही उत्साही उपस्थिती दर्शवित मानवी साखळीच्या यशस्वितेमध्ये सक्रीय सहभाग घेतला. मानवी साखळीच्या आयोजनानंतर विविध स्वयंसेवी संस्थांच्या पर्यावरणप्रेमी प्रतिनिधींनी पामबीच मार्गालगतच्या कांदळवनात सफाई मोहिम राबवून पर्यावरणशीलतेचे दर्शन घडविले. स्वच्छता संदेश प्रसारणासह मानवी साखळीच्या अभिनव उपक्रमाची नोंद राष्ट्रीय विक्रम स्वरुपात नोंदविली गेल्याने नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »