महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

नरेंद्र मोदींनी भारत कधीच जोडलाय तुम्ही आधी तुमची पार्टी जोडा – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी -महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी नंतर सत्तांतर झाले. शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यातच महाराष्ट्र मध्ये विविध निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसलेली दिसून येत आहेत. यात भाजप मोठ्या ताकातीनिशी उतरणार आहे असे दिसत आहे . या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत.केंद्रीय माहिती प्रसारण आणि क्रिडामंत्रीअनुराग ठाकूर हे ३ दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये दिल्लीच्या जेएनयुमधील टुकडे टुकडे गँगचाही समावेश असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय माहिती प्रसारण आणि क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आज डोंबिवलीमध्ये केला. अनुराग ठाकूर हे ३ दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप करत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे.

दिल्लीतील जे एन युमध्ये भारताचे टुकडे व्हावेत म्हणून काहीजण कल्पना आणि व्यूहरचना आखत होते. आणि याच टुकडे टुकडे गँगचे सदस्य राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले असून त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी मध्यरात्री जात असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच भारत जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे राहूल गांधी यांनी देश नव्हे तर आपला पक्ष जोडण्यकडे लक्ष द्यावे असे सांगत केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी या भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवली.

या वेळी अनुराग ठाकूर यांच्यासह केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार आदी भाजप नेतेही उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »