महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पोलिस टाइम्स

खारी बटर विक्रीच्या वादातून एकाची हत्या,तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी.

कल्याण – खारी बटर विक्रीच्या वादातून एकाची  हत्या झाल्याची घटना कल्याण मधील वालधुनी परिसरात घडली आहे. रोशनलाल कनोजिया (४५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून हि हत्या करणाऱ्या तिघांना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण मधील वालधुनी येथे राहणारा अमर बहादूर विपत कनोजिया याचा कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय होता. मात्र लॉकडाऊनमध्ये हा इस्त्रीचा व्यवसाय बंद पडल्याने अमर कनोजिया याने खारी बटर टोस्ट पाव विकण्याचा व्यवसाय सुरु केला. जून महिन्यात अमर याचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या आणि पाव विक्री करणाऱ्या सलाउद्दीन अन्सारी, काशीबुद्दिन अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी यांच्यात पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता. अमरने खारी बटर टोस्ट पाव विक्रीचा व्यवसाय सुरु केल्याने सलाउद्दीन अन्सारी याच्याकडील गिर्हाईक अमरकडे जाऊ लागले होते याचा देखील राग त्यांच्या मनात होता.
आज सकाळी देखील अमर कनोजिया आणि सलाउद्दीन यांच्यात असाच वाद सुरु असतांना सलाउद्दीन अन्सारी, काशीबुद्दिन अन्सारी यांनी अमर याला शिवीगाळ, दमदाटी करून त्याच्या छातीवर पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी अमर याचे भाऊ रोशनलाल कनोजिया हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना देखील छातीवर, पोटावर व शरीरावर लाथाबुक्क्यांनी जोर जोराने मारहाण केली. यामुळे रोशनलाल खाली पडले असता, त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी अमर कनोजिया याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सलाउद्दीन अन्सारी (२५), काशीबुद्दिन अन्सारी (२८) आणि मोहम्मद अन्सारी (२०) या तिघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती एसीपी अनिल पोवार यांनी दिली.

Related Posts
Translate »