महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी ताज्या घडामोडी

धान घोटाळा चौकशी प्रकरणी मुंबईचे पथक गोंदियात दाखल

नेशन न्यूज मराठी टीम.

गोंदिया / प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यात सध्या धान खरेदीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात गाजत असून अनेक धान खरेदी संस्था या घोटाळ्यामध्ये अलिप्त असल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर राईस मिल सुद्धा तांदूळ घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. धान खरेदी संस्था यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सध्या गोंदिया जिल्ह्यात मुंबई येथील 6 लोकांचे भरारी पथक आता कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागून आहेत.

नुकतेच गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये श्रीराम अटल अभिनव धान सोसायटी चूटीया द्वारा 433 शेतकऱ्यांनी धान्य खरेदी केली होती. या संस्थेने 15 हजार 996 क्विंटल धान शेतकऱ्यांकडून खरेदी केली. याची किमंत रुपये 3 कोटी 26 लाख रकमेचे धान केंद्रावर खरेदी केली होती. परंतु संस्थेने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन द्वारा दिलेल्या टीओ अनुसार राइस मिलर्स ला धान पुरवठा केलाच नाही. त्यामुळेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी यांनी या खरेदी केंद्रावरच्या विरोधात गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने एक समिती स्थापन करून ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी करून त्यांच्या सातबारा नुसार अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठवलेला आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल नागरिक पुरवठा अधिकारी सचिवालय यांना पाठविला असून लवकरच मंत्रालयाकडून शेतकऱ्यांचे चुकारे देण्याचे निर्णय होणार आहे.

सध्या गोंदिया जिल्ह्यात मुंबई येथील भरारी पथकाची दाखल झाल असून हे भरारी पथक सर्व धान संस्थानाची चौकशी करत आहे. या भरारी पथकामध्ये मुंबईतील सहा अधिकारी असून ते सर्व संस्थांच्या चौकशी करणार तसेच धान खरेदी केंद्र चालवणाऱ्या संचालक मंडळाच्या मालमत्तेची चौकशी करणार आहेत. त्यांच्या अहवाला नुसार कारवाई करण्याचे निर्णय जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी यांनी घेतला आहे. तरी मात्र अद्यापही सहा संस्था जिल्ह्यामध्ये समावेशअसून त्यावर सुद्धा कारवाही करण्याचे संकेत देण्यात आले आहे.

या वर्षी रब्बी हंगामामध्ये 14 लाख 16 हजार 554 सेंटर ने धान्याची खरेदी केली, असून 200 कोटी 97 हजार 097 रुपयाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र अद्यापही 13 कोटी 47 लक्ष 34 हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे चुकारे अद्याप प्रलंबित असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »