महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पर्यटन

मुंबई खास मुंबई 24 तास

मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकणाऱ्या महत्वाकांक्षी अशा ‘मुंबई 24 तास’ संकल्पनेला आता मूर्त स्वरुप प्राप्त होत आहे. या संकल्पनेबाबत पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ सदस्यांना माहिती दिली. याविषयावर चर्चा झाली. त्यानंतर आता येत्या 27 जानेवारीपासून मुंबईत हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे आणि गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, येत्या 27 जानेवारीपासून ‘मुंबई 24 तास’ संकल्पना प्रत्यक्षात सुरु होणार आहे. यातून नवीन रोजगार निर्मिती आणि मुंबईच्या पर्यटन विकासाचे ध्येय आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर मॉल्स, गेटेड कंपाउंड, बीकेसीमधील एक लेन, नरीमन पॉइन्टमधील एक लेन अशा ठराविक भागात हा उपक्रम सुरु होणार आहे. बिगरनिवासी भागातच हा उपक्रम राबविला जाईल. सुरक्षेच्या उपाययोजना, पार्कींग, कामगार कायदे, अन्न सुरक्षा, अग्नि सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन आदी सर्व नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, दुकाने आणि आस्थापना कायद्यामध्ये 2017 मध्येच सुधारणा झाली. पण त्यावेळी त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता ‘मुंबई २४ तास’च्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरु होत आहे. लंडन येथील नाईट इकॉनॉमी ही जवळपास 5 बिलीयन पाउंडची आहे. ‘मुंबई 24 तास’ उपक्रमामुळे व्यवसाय, उद्योग, पर्यटन आणि रोजगार वाढल्याने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
एक्साईज संदर्भातील कायद्यामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे पब, बार इत्यादी सध्या प्रचलीत नियमानुसार व सध्या निश्चित असलेल्या वेळेतच सुरु राहतील. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. इथे रात्री येणाऱ्या पर्यटकांना ‘मुंबई 24 तास’मुळे सुविधा उपलब्ध होतील. ‘मुंबई 24 तास’मुळे विविध आस्थापना 3 पाळ्यांमध्ये (3 शिफ्टमध्ये) सुरु राहतील. त्यामुळे रोजगारात 3 पट वाढ होईल, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
Related Posts
Translate »