महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी चर्चेची बातमी

रेशीमवाडी म्हणून प्रसिद्धीस आलेल्या, साबळेवाडीत तब्बल १५० क्षेत्रात तुतीची लागवड

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे / प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यात साबळेवाडी गावाची ओळख रेशीम उद्योगामुळे रेशीमवाडी म्हणून झाली आहे. बारामती तालुक्यात सुमारे सोळाशे लोकसंख्येचे साबळेवाडी गाव आहे. सन २००५ च्या आसपास गावातील मोजके शेतकरी रेशीम व्यवसायाकडे वळले.कोषांना मिळणारा चांगला दर आणि पिकांच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न पाहून गावातील अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

आज तालुक्यातील २५० एकर क्षेत्र वर तूतीची लागवड आहे. त्यापैकी साबळेवाडी परिसरातील क्षेत्र १५० एकरांपर्यंत आहे. कृषी विभाग,रेशीम कार्यालय यांच्या सहकार्यातून शेतकरी गट बांधणी,अनुदानांद्वारे रेशीम उद्योगवाढीस प्रोत्साहन मिळाले आहे.विक्री व्यवस्था तयार झाली आहे. कोरडवाहू पट्ट्यात शेतकऱ्यांना रेशीम शेतीचा हुकमी पर्याय गवसला आहे.

रेशीम शेड उभारणीसाठी शेतकऱ्यांनी दोन ते पाच लाख रुपयांपर्यत गुंतवणूक केली आहे.कर्नाटक,गडहिंग्लज येथून अंडीपुंज आणले जातात.चॉकी सेंटरमधूनही बाल्यावस्थेतील अळ्या उपलब्ध होतात. बारमाही पाणी असल्यास शंभर ते दोनशे अंडीपुजांची एक अशा वर्षात चार ते पाचपर्यंत बॅचेस घेण्यात येतात. अळ्यांच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेत पुरेशी जागा ठेवली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.तुती लागवडीमुळे आमच्या कुटुंबाची आर्थिक उलाढाल झाली असून आमच्या कुटुंबातील मुले चांगले शिक्षण घेत आहेत त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील या व्यवसायाकडे वळले पाहिजे असे महिला शेतकऱ्यांनी सांगितले..

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »