महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे मुख्य बातम्या

राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून महावितरणची ३९ लाखांची थकबाकी वसूल,१६१ ग्राहकांचा वीजपुरवठा पुर्ववत

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – तालुकास्तरावर आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या माध्यमातून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित १६१ ग्राहकांची घरे पुन्हा प्रकाशमान झाली आहेत. या ग्राहकांनी महावितरणकडून उपलब्ध करून दिलेल्या सवलतीचा लाभ घेत ३९ लाख ४४ हजार रुपयांची थकबाकी भरून तडजोड केल्याने त्यांचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात येत आहे.

कल्याण परिमंडलातील जवळपास १५ हजार ग्राहकांना राष्ट्रीय लोक न्यायालयात सहभागी होण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. परंतू १६१ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व ३९ लाख ४४ हजार रुपयांची थकबाकी वसूल झाली. कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवलीत २५, कल्याण पश्चिमेत १६ आणि कल्याण पूर्व विभागात १२ अशा एकूण ५३ ग्राहकांनी थकीत २३ लाख ५७ हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला.

तर कल्याण मंडल दोन अंतर्गत १० लाख २४ हजार रुपयांची थकबाकी भरणाऱ्या ४७ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. यात उल्हासनगर न्यायालयात २६ व कल्याण येथील न्यायालयात २१ प्रकरणांचा समावेश आहे. वसई मंडलांतर्गत वसई व विरामधील ६१ ग्राहक लोक अदालतीत सहभागी झाले. परंतू १३ प्रकरणांमध्ये २ लाख ९० हजार रुपयांची वसूली होऊ शकली. पालघर मंडलात सर्वाधिक १९४ ग्राहकांनी सहभाग नोंदवला. यातील ४८ ग्राहकांनी २  लाख ७३ हजार रुपयांचा भरणा करून आपली प्रकरणे निकाली काढली.

लोक अदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधिक्षक अभियंते, सहायक विधी अधिकारी राजीव वामन, शिल्पा हन्नावार, उपविधी अधिकारी दीपक जाधव यांनी प्रयत्न केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »