महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

जगभरात राष्ट्राचा गौरव वाढविण्यात चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावू शकतात- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – जगभरात राष्ट्राचा गौरव  वाढविण्यात चित्रपट  हे  महत्त्वाची भूमिका निभावू शकतात  असे प्रतिपादन  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. मुंबई येथे झालेल्या दोन दिवसीय चर्चासत्राच्या समारोप समारंभाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करताना केंद्रीय मंत्री ठाकूर पुढे म्हणाले, “ जगभरात राष्ट्राचा गौरव  वाढविण्यात चित्रपट महत्त्वाची भूमिका निभावू शकतात . ते आज मुंबईत सांस्कृतिक संबंध विषयक भारतीय परिषद (आयसीसीआर) आणि फ्लेम युनिवर्सिटी  यांच्यावतीने आयोजित भारतीय सिनेमा आणि सॉफ्ट पॉवर या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राच्या समारोप सत्रात ते बोलत होते. भारतीय चित्रपट उद्योग आणि केंद्र सरकार यांनी उच्च स्तरावरून  आज संस्कृतीमधील क्षमतेला ओळखले आहे. एखाद्याच्या संस्कृतीचे चित्रण हा कोणत्याही देशाच्या सुप्त सामर्थ्याचा अत्यंत सशक्त घटक आहे.” असे त्यांनी सांगितले. 

कल्पनांच्या बाबतीत जागतिक बाजारामध्ये स्वतःला आकर्षक म्हणून सिध्द करण्याची देशाची क्षमता हा आज समकालीन आंतरराष्ट्रीय संबंधांचा महत्त्वाचा पैलू झाला आहे असे ते पुढे म्हणाले . “राष्ट्राचा गौरव  वाढविण्याच्या उपक्रमावर लक्ष केंद्रित करून चित्रपट यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतो,” त्यांनी पुढे सांगितले.

वेगवान उदारीकरण, नियमांतून मुक्तता, माध्यमांचे तसेच सांस्कृतिक उद्योगाचे  खासगीकरण यांनी गेल्या काही दशकांत भारतातील चित्रपट उद्योगामध्ये परिवर्तन घडवून आणले आहे आणि त्याच वेळी जागतिक डिजिटल माध्यम उद्योगांचा तसेच वितरण तंत्रज्ञानाचा विस्तार यांच्यामुळे भारतीय मनोरंजन वाहिन्या आणि चित्रपट जागतिक माध्यम अवकाशात अधिक प्रमाणात दृश्यमान झाले आहेत असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

जागतिक नकाशावर भारतीय चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेविषयी बोलताना ठाकूर म्हणाले, “हिंदी चित्रपट आज संपूर्ण जगभरात एकाच वेळी प्रदर्शित होतात आणि त्यात असलेले तारे- तारका आता आंतरराष्ट्रीय जाहिरात आणि मनोरंजनाच्या जगतात मान्यता मिळवलेले चेहेरे असतात.” ते पुढे म्हणाले, “अगदी दूरवरचे आफ्रिकी देश देखील आपले चित्रपट आणि संगीताने मोहित होत आहेत. नायजेरिया सारख्या देशांमध्ये असलेली नॉलीवूड  ही त्यांची चित्रपटसृष्टी भारतीय चित्रपटांकडून मोठ्या प्रमाणात प्रेरणा घेते हे आपण जाणतो. बॉलीवूड आता लॅटिन अमेरिकेसारख्या अनोळखी देशात देखील पोहोचले आहे. आपला चित्रपट आता दक्षिण कोरिया, जपान,चीन यांसारख्या देशांमध्ये प्रवेश करत आहे.”

भारतीय भाषांतील चित्रपटांनी बजावलेल्या भूमिकेवर देखील त्यांनी त्यांच्या भाषणात भर दिला. ते म्हणाले, “केवळ हिंदी चित्रपटच नव्हे तर इतर भारतीय भाषांमधील चित्रपट देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा प्रेक्षकवर्ग मिळवत आहेत.”

शासकीय पातळीवरील मुत्सद्देगिरीला मदत करण्याच्या बाबतीत चित्रपट उद्योगाच्या भूमिकेबाबत बोलताना केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की अधिक मोठ्या समुदायांच्या मदतीने लोकप्रिय झालेल्या आपल्या चित्रपटांचे जागतिकीकरण, भारताच्या शासकीय मुत्सद्देगिरीला प्रोत्साहन देण्यात उपयुक्त ठरू शकेल. “आपल्या चित्रपट समुदायाची शक्ती आणि भारताचे सामर्थ्य वापरून भारताचा ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला सार्वजनिक-खासगी भागीदारीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे आणि त्यातून उत्तम दर्जाची आशय निर्माण समृद्ध आशयाच्या बळावर जगातील अग्रेसर उपखंड होण्याची क्षमता भारतात आहे.” असे  ते म्हणाले.

देशाच्या विविध भागातून 95 पेक्षा अधिक जाणकारांनी या चर्चासत्रात सहभाग  घेतला,ज्यामध्ये भारतीय चित्रपट आणि त्याच्या सुप्त सामर्थ्याच्या संकल्पनेवर प्रथमच चर्चा झाली, असे या कार्यक्रमाला संबोधित करताना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

जगभरात भारतीय चित्रपटांची पोहोच वाढवण्यासाठी, अनेक परदेशी भाषांमध्ये विशेषतः म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया, कझाकस्तान या  भारताचा सांस्कृतिक प्रभाव मजबूत असलेल्या देशांच्या भाषांमध्ये भारतीय चित्रपटांच्या उपशीर्षकांसाठी संस्थात्मक व्यवस्था उभारण्याला समर्थन सहस्रबुद्धे यांनी समर्थन दर्शवले. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, भारतात परदेशी भाषा प्रशिक्षण आणि सुप्त सामर्थ्य  या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करेल, अशी माहिती सहस्रबुद्धे यांनी दिली. मागे सोडलेल्या संस्कृतीच्या  भूतकाळातील रम्य  आठवणीं ज्यांच्या स्मरणात आहेत अशा अनिवासी भारतीयांना आम्ही आपल्या  भाषेतील सिनेमा दाखवू शकतो, असे  भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षांनी सांगितले. ‘चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सुप्त सामर्थ्य प्रसारस्नेही चित्रपट’ यासारखी श्रेणी सादर केली जाऊ शकते, असे ते म्हणाले. भारताविषयी सर्वसमावेशक आणि योग्य समज दाखवणाऱ्या चित्रपटांना या श्रेणीत पुरस्कार मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »